शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात घसरण; गृहिणींना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST

जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्या लागवडीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून भाज्यांच्या दरात वाढ झाली ...

जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्या लागवडीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांपर्यंत भाज्यांचे दर चढेच होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड केली. परिणामी, मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भाज्यांच्या दरात घसरण होत आहे. पत्ताकोबी, फ्लाॅवर, टोमॅटोचे दर उतरले आहेत. टोमॅटो ५, पत्ताकोबी, फ्लाॅवर १०, बटाटा, काकडी २०, कारले, दोडका, वांगी, भेंडी ४० रुपये तर गवार ५० रुपये दराने विक्री होत आहे. शिमला मिरची ३०, हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. तर शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा ८० रुपये ते १०० रुपये प्रतिकिलोने विक्री झाला.

चौकट...

कोट...

मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर उतरले आहेत. मेथी १० रुपयास एक जुडी विक्री होत आहे. कोथिंबीर ५ रुपये जुडी, पालक १० रुपये, शेपू, चुका १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रत्यांनी सांगितले.

डाळींचे दर जैसे थे

फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे, तर दुसरीकडे डाळीचे दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. सध्या हरभरा डाळ ६१, तूर डाळ ८०, उडीद ९२, मूग ८५, मसूर ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. सोयाबीन तेल १२०, पामतेल ११५, शेंगदाणा तेल १३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

पपई २० रुपये किलो

सफरचंद १२० ते २०० रुपये, चिकू ५० ते ८० रुपये, संत्रा ७० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मोसंबी ८० ते १०० रुपये, रामफळ १२०, पपई २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

प्रतिक्रिया

मागणीच्या तुलनेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. आणखीन काही दिवस भाज्यांचे दर असेच राहण्याची शक्यता आहे. महादेव साठे, भाजीपाला विक्रेते

तेलाचे दरात काहीअंशी वाढ झालेली आहे. डाळींचे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत. हरभरा ६१, तूर ८०, मूग डाळ ८५ रुपये किलोने विक्री होत आहे. अमित गांधी, किराणा व्यावसायिक

तेलाचे दर वाढल्याने खिशाला कात्री लागत आहे. फळभाज्या व पालेभाज्यांचे दर कमी आहेत. डाळींचे दरही सामान्यांच्या आवाक्यात असल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. सचिन झोंबाडे, ग्राहक