शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

प्रवासी संख्या रोडावली तरीही एसटीची चाके गतिमानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी बसला प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे १०० गाड्या बंद झाल्या असून, सध्या २२५ ...

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी बसला प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे १०० गाड्या बंद झाल्या असून, सध्या २२५ बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या एकूण सहा आगाराच्या ४५० बसेस आहेत. गतवर्षी लॉकडाऊन काळात दोन महिने बसेस बंद होत्या. त्यानंतर मे महिन्यात ५० टक्के प्रवासी क्षमतेनुसार बसेस धावू लागल्या. दिवाळी सणापासून बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. त्यामुळे ५४० पैकी ३५० बसेस सुरु झाल्या होत्या. पुन्हा मार्च महिन्यात रुग्णांचा आकडा वाढू लागला. वाढत्या रुग्णांमुळे प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. परिणामी, महामंडळाने बसच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. सध्या २२५ बस गाड्यांच्या ८०० फेऱ्या होत आहेत. यातून एसटीला प्रतिदिन २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, तर २२५ बसेस अद्याप डेपोतच थांबून आहेत.

एकूण नुकसान ८२ कोटी

चालक १०१५

वाहक ९३०

एकूण कर्मचारी २५००

रोजच्या बसफेऱ्या ८००

नुकसानीचा आकडा सातत्याने वाढतोय

गेले वर्ष तोट्याचेच

गेल्या वर्षी २ महिने बसेस डेपातच थांबून होत्या. या काळात प्रतिदिन ५० लाख रुपयांचा फटका महामंडळास बसला होता. त्यानंतर बसेस सुरु झाल्या तरी दिवसाकाठी २० लाख रुपये उत्पन्न कमीच येत आहे. वर्षभरात ८२ कोटीचा फटका एसटीला झाला.

शाळा बंद झाल्याने शंभर बसेस बंद

जिल्ह्यातील विविध मार्गांवर ३२५ ते ३५० बसेस धावत होत्या. शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने सध्या १०० बस गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय, जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू असल्याने रविवारी बसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असतो. त्याचबरोबर इतर दिवशीही विविध मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानंतर बस फेरी रद्द करण्यात येते.

सध्या प्रवासी संख्या कमी झाली असल्याने ७२ पैकी २६ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. ४४ बस गाड्या सुरु आहेत. बसमध्ये मास्कशिवाय प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. तसेच बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

पी. एम. पाटील, आगार प्रमुख