शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या दृष्टीने उमेदवार निवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

उमरगा : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी ग्रामपंचायतच्या सत्ताकेंद्रावर लागावी, यासाठी गावपातळीवरील प्रत्येक पक्षाचा ...

उमरगा : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी ग्रामपंचायतच्या सत्ताकेंद्रावर लागावी, यासाठी गावपातळीवरील प्रत्येक पक्षाचा गावपुढारी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने त्या दृष्टीनेच उमेदवारांचा शोध देखील घेतला जात आहे. तालुक्यातील तुरोरी, मुळज, बलसुर, दाळींब, गुंजोटी या मोठ्या गावातही ग्रामपंचायत निवडणुका होत असून, व्यापाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या तुरोरी येथे मागील तीस वर्षांपासून काँग्रेस व सेना आलटून पालटून सत्तेवर येतात. यावेळी मात्र येथे काँग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांनी पॅनल तयार केले असून, व्यापारी महासंघाने ही आपले स्वतंत्र पॅनल उतरविल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे गावातील प्रतिष्ठित व नागरिकांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही पॅनलच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून, येत्या दोनचार दिवसात काय निर्णय होतो हे कळणार आहे

भाजपचे नेते कै. शिवाजीदादा चालुक्य व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील यांचे गाव असलेल्या मुळज येथेही निवडणूक होऊ घातली आहे. या दोन नेत्यांच्या प्रभावाखाली हे गाव विभागले गेले असले तरी दिवंगत शिवाजीदादा चालुक्य यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चालुक्य यांनी मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाल्याचे दिसून येते. त्यातूनच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी त्यांच्यात बोलणी चालू असली तरी काँग्रेसचाही येथे प्रभाव असल्याने त्यांनीही पॅनलची तयारी सुरू केली आहे.

गुंजोटी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव आहे. येथे मागील पाच वर्षात काँग्रेसची सत्ता होती. याही वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढत असून, शिवसेनेनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, यावेळी माजी सैनिक देखील ग्रामपंचायतच्या निवडणूक मैदानात उतरत असून, गावात माजी सैनिकांची संख्या लक्षणीय असून असल्याने स्वतंत्र पॅनल तयार करून मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. यासोबतच दाळींब व बलसूर या गावात राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव असून, येथे राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली असली तरी काँग्रेस व शिवसेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील या मोठ्या गावात सर्वच पक्षांनी आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालविले असून, सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार असल्याने राजकीय पक्ष प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सरपंचपदाचे आरक्षण व त्यासाठी आवश्यक असलेल्या आपल्या गटातील माणूस कोण, याचा शोध घेत आहेत.

४९ ग्रामपंचायतींची निवडणूक

१७१ प्रभाग

४५३ सदस्य

९०७८० एकूण मतदार

४२६५३ महिला

४८१२७ पुरूष