शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा भडका कायम; शेवगा, गवार, कारल्याचे दर चढेच,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

मागील तीन महिन्यापासून तेलाच्या दरात वाढत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यात आखणी वाढ झाली. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. ...

मागील तीन महिन्यापासून तेलाच्या दरात वाढत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यात आखणी वाढ झाली. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. सध्या पामतेल ११० रुपये किलो, सोयाबीन तेल ११५ ते १२० रुपये, शेंगदाणा तेल १४० ते १५० रुपये किलोन विक्री होत आहे. या सर्वच तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले आहेत. तर दुसरीकडे पालेभाज्यांची आवक वाढू लागल्याने भाज्यांचे दर उतरले आहेत. कांदा, ४० बटाटा ३०, भेंडी ३०, दोडका ४०, पत्ताकोबी २०, फ्लाॅवर, पत्ताकोबी, टाेमॅटो २० रुपये किलोने विक्री होत आहे. शिमला मिरची, हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. शेवगा, गवार, कारल्याची आवक कमी असल्याने याचे दर वाढले आहेत. शेवगा ८० रुपये, गवार ६० रुपये तर कारले ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी फळे लाभदायक असल्याने फळांच्या खरेदीसाठी बाजारात नागरिक गर्दी करु लागले आहेत.

कोट...

पाऊण एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी १५ हजार खर्च झाला. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही. रामलिंग नरवडे, भाजीपाला उत्पादक

यंदा लाॅकडाऊन काळात तेलाचे दर वाढलेले आहेत. मागील तीन महिन्यापासून तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. शेंगदाना ८८ रुपये किलो विक्री होत आहे.

अमित भराटे,किराणा व्यवसायिक

पाऊण एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी १५ हजार खर्च झाला. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही. रामलिंग नरवडे, भाजीपाला उत्पादक

चौकटी...

बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, पालक, चूका ५ रुपये जुडी प्रमाणे विक्री होत आहे. कोंथीबीर १० रुपयास दोन ते तीन जुड्या विक्री केल्या जात आहेत. लिंबाचे दरही उतरले असून, १० रुपयास १५ नग लिंबू विक्री झाले.

भाज्यांचे दर उतरले असल्याने डाळींचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. हरभरा डाळ ५६, तूर डाळ ८८, मूसर डाळ ६३, उडीद डाळ ९० रुपये, मूग डाळ ९० रुपये किलोने विक्री होत आहे. शेंगदाणा ८८ रुपये, साखर ३२ रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी सांगितली.

बाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. डाळींब १४० ते १६० रुपये किलो, सफरचंद १०० ते १४० रुपये, संत्रा ५० ते ८० रुपये, चिकू ६० रुपये तर पेरु ३० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहेत.