शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खाद्यतेलाचा भडका कायम; शेवगा, गवार, कारल्याचे दर चढेच,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

मागील तीन महिन्यापासून तेलाच्या दरात वाढत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यात आखणी वाढ झाली. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. ...

मागील तीन महिन्यापासून तेलाच्या दरात वाढत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यात आखणी वाढ झाली. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. सध्या पामतेल ११० रुपये किलो, सोयाबीन तेल ११५ ते १२० रुपये, शेंगदाणा तेल १४० ते १५० रुपये किलोन विक्री होत आहे. या सर्वच तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले आहेत. तर दुसरीकडे पालेभाज्यांची आवक वाढू लागल्याने भाज्यांचे दर उतरले आहेत. कांदा, ४० बटाटा ३०, भेंडी ३०, दोडका ४०, पत्ताकोबी २०, फ्लाॅवर, पत्ताकोबी, टाेमॅटो २० रुपये किलोने विक्री होत आहे. शिमला मिरची, हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. शेवगा, गवार, कारल्याची आवक कमी असल्याने याचे दर वाढले आहेत. शेवगा ८० रुपये, गवार ६० रुपये तर कारले ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी फळे लाभदायक असल्याने फळांच्या खरेदीसाठी बाजारात नागरिक गर्दी करु लागले आहेत.

कोट...

पाऊण एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी १५ हजार खर्च झाला. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही. रामलिंग नरवडे, भाजीपाला उत्पादक

यंदा लाॅकडाऊन काळात तेलाचे दर वाढलेले आहेत. मागील तीन महिन्यापासून तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. शेंगदाना ८८ रुपये किलो विक्री होत आहे.

अमित भराटे,किराणा व्यवसायिक

पाऊण एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी १५ हजार खर्च झाला. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही. रामलिंग नरवडे, भाजीपाला उत्पादक

चौकटी...

बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, पालक, चूका ५ रुपये जुडी प्रमाणे विक्री होत आहे. कोंथीबीर १० रुपयास दोन ते तीन जुड्या विक्री केल्या जात आहेत. लिंबाचे दरही उतरले असून, १० रुपयास १५ नग लिंबू विक्री झाले.

भाज्यांचे दर उतरले असल्याने डाळींचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. हरभरा डाळ ५६, तूर डाळ ८८, मूसर डाळ ६३, उडीद डाळ ९० रुपये, मूग डाळ ९० रुपये किलोने विक्री होत आहे. शेंगदाणा ८८ रुपये, साखर ३२ रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी सांगितली.

बाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. डाळींब १४० ते १६० रुपये किलो, सफरचंद १०० ते १४० रुपये, संत्रा ५० ते ८० रुपये, चिकू ६० रुपये तर पेरु ३० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहेत.