शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

मुख्याधिकाऱ्यांअभावी पालिकेच्या कामकाजाची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

उमरगा : येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे मागील सात-आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला ...

उमरगा : येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे मागील सात-आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यामुळे ते सध्या उस्मानाबादेत मुक्कामी असून, आठवड्यातील एखादा दिवस येथे हजेरी लावतात. त्यामुळे पालिकेतील कामकाजाची घडी विस्कटली असून, अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.

मुबलक पाणी असतानाही सध्या शहरात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दररोज एखाद्या वाॅर्डातील नागरिक, महिला पालिकेत धरणे देतात वा घेराव घालत असताना यावर कसलाच तोडगा निघत नाही. स्वच्छता, घरकुल, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी, बांधकाम परवाने, विकासकामे याकडेदेखील पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साथीच्या आजाराने कहर केला आहे. घरकुल योजनेची अंमलबजावणी, बांधकाम परवानगी, विकासकामे व त्यांचे नियोजन, विविध कामांची देयके, करवसुली, विविध योजनेंतर्गत येणाऱ्या विकास निधींचा वापर करण्याबाबतच्या सूचना, परवानग्या ही कामे मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीविना खोळंबून राहत आहेत. उमरगा हे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या महत्त्वाच्या पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना आठ-नऊ महिने इतरत्र प्रभारी नियुक्ती का दिली जाते, असा प्रश्न आता शहरवासीयांतून उपस्थित होत आहे.

कोट.........

मुबलक पाणीसाठा असतानाही गळतीमुळे शहराला पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षभरात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तसेच नवीन नियोजित पाणीपुरवठा योजनेला कार्यान्वित करण्यासाठीही फारशी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळेच शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र बनत आहे. आमच्या प्रभाग-९ मध्ये पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. मुख्याधिकारीच नसल्याने समस्या मांडायच्या कुणासमोर, असा प्रश्न आहे.

-दत्तू रोंगे, सामाजिक कार्यकर्ते

कोट.........

उमरगा पालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असूनही ते कायम गैरहजर असतात. आठवड्यातून एखादा दिवसच हजर राहत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाला त्यांना येथे कामच करू द्यायचे नव्हते, तर येथे नियुक्ती दिली कशासाठी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. येथे नवीन मुख्याधिकारी नियुक्त करून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी आमची मागणी आहे.

-संजय पवार, गटनेते, राष्ट्रवादी