शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दारू विक्रेत्याविरूध्द दरोड्याचा गुन्हा

By admin | Updated: June 1, 2014 01:02 IST

उस्मानाबाद : दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : महिला बचत गटाच्या महिलांनी दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी दारूविक्रेत्यासह सहा जणांविरूध्द शनिवारी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी कनगरा (ता़उस्मानाबाद) येथे घडली. कनगरा येथील बचत गटाच्या महिलांनी अवैधरित्या दारूविक्री करणार्‍यांविरूध्द कारवाईची मागणी बेंबळी पोलिसांकडे केली होती़ मात्र, पोलिसांनी महिलांनीच दारू पकडून दाखवावी, अशा सूचना देत मागणीकडे दुर्लक्ष केले होते़ त्यामुळे संतप्त महिलांनी अवैधरीत्या दारूविक्री करणार्‍या शशीकांत राठोड याच्याकडील दारू पकडून पोलिसांना माहिती दिली होती़ मात्र, पोलिसांनी कारवाई न करता दारू सांडून दिली. तर शशीकांत राठोड याच्यासह इतरांनी एका महिलेच्या अंगावरील मणीमंगळसूत्र हिसकावून घेत तिचा विनयभंग केला़ यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली़ या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यासह आलेल्या शेकडो कर्मचार्‍यांनी घराचे दरवाजे तोडत ग्रामस्थांवर अमानुष लाठीहल्ला केल्याची तक्रार कनगरा ग्रामस्थांनी केली होती़ या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध झाला़ विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी कनगरा गावास भेट देऊन पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर सपोनि बनसोडे यांच्यासह इतर तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले़ अखेर गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी शुक्रवारी कनगरा गावास भेट देवून ग्रामस्थांसमोरच पोलीस अधीक्षकांची हजेरी घेतली़ यावेळी त्यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतानाच अवैध दारूविक्रेत्याविरूध्दही कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ दरम्यान, २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास दारूविक्रेत्या शशीकांत राठोड याच्यासह मीनाक्षी राठोड, शोभा राठोड, वकिल्या, छायाबाई, सोनाबाई राठोड यांनी संगणमत करून एका ३० वर्षीय महिलेस शिवीगाळ केली़ यावेळी शशिकांत राठोड याने तिचा विनयभंग केला तर वकिल्या याने गळ्यातील मंगळसूत्रासह दागिने ओढून घेतले़, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून वरील सहा जणांविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे तालुक्यतील कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबरोबरच तेथील १८ कुटुंबियाच्या घरांचे नुकसान केले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील कनगरा येथे दारूबंदीच्या कारणावरून झालेल्या वादातून सोमवारी रात्री शेकाडो पोलिसांनी ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केली होती. यात अनेकांच्या घरांचेही पोलिसांनी नुकसान केले. पंचनाम्यानुसार लतीफ पठाण यांच्या घराचा चौकटीसह दरवाजा तुटून व स्वयंपाक घरातील अन्नधान्याची नासधूस झाली आहे. लहूराज रामभाऊ गुंड, युवराज बाबू माने, भैरु गोविंद भंडारकर, विजयकुमार गोविंद भंडारकर, दादासाहेब गोविंद भंडारकर, व्यंकट हरीबा धाराव, सुरेश दगडू माने, श्रीमंत अर्जुन इंगळे, वजीर इस्माईल शेख, अभिमन्यू इंगळे, नितीन हरिदास इंगळे, बाबूलाल अंबीर शेख, संजय शंकर धस, लक्ष्मण तुळशीराम गुजरे, अरुण पल्हाद इंगळे, रामराव नाना धाराव व लालासाहेब व इकाम शेख आदींच्या घराचेही पोलिसांनी नुकसान केले आहे.