शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

दारू विक्रेत्याविरूध्द दरोड्याचा गुन्हा

By admin | Updated: June 1, 2014 01:02 IST

उस्मानाबाद : दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : महिला बचत गटाच्या महिलांनी दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी दारूविक्रेत्यासह सहा जणांविरूध्द शनिवारी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी कनगरा (ता़उस्मानाबाद) येथे घडली. कनगरा येथील बचत गटाच्या महिलांनी अवैधरित्या दारूविक्री करणार्‍यांविरूध्द कारवाईची मागणी बेंबळी पोलिसांकडे केली होती़ मात्र, पोलिसांनी महिलांनीच दारू पकडून दाखवावी, अशा सूचना देत मागणीकडे दुर्लक्ष केले होते़ त्यामुळे संतप्त महिलांनी अवैधरीत्या दारूविक्री करणार्‍या शशीकांत राठोड याच्याकडील दारू पकडून पोलिसांना माहिती दिली होती़ मात्र, पोलिसांनी कारवाई न करता दारू सांडून दिली. तर शशीकांत राठोड याच्यासह इतरांनी एका महिलेच्या अंगावरील मणीमंगळसूत्र हिसकावून घेत तिचा विनयभंग केला़ यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली़ या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यासह आलेल्या शेकडो कर्मचार्‍यांनी घराचे दरवाजे तोडत ग्रामस्थांवर अमानुष लाठीहल्ला केल्याची तक्रार कनगरा ग्रामस्थांनी केली होती़ या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध झाला़ विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी कनगरा गावास भेट देऊन पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर सपोनि बनसोडे यांच्यासह इतर तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले़ अखेर गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी शुक्रवारी कनगरा गावास भेट देवून ग्रामस्थांसमोरच पोलीस अधीक्षकांची हजेरी घेतली़ यावेळी त्यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतानाच अवैध दारूविक्रेत्याविरूध्दही कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ दरम्यान, २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास दारूविक्रेत्या शशीकांत राठोड याच्यासह मीनाक्षी राठोड, शोभा राठोड, वकिल्या, छायाबाई, सोनाबाई राठोड यांनी संगणमत करून एका ३० वर्षीय महिलेस शिवीगाळ केली़ यावेळी शशिकांत राठोड याने तिचा विनयभंग केला तर वकिल्या याने गळ्यातील मंगळसूत्रासह दागिने ओढून घेतले़, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून वरील सहा जणांविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे तालुक्यतील कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबरोबरच तेथील १८ कुटुंबियाच्या घरांचे नुकसान केले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील कनगरा येथे दारूबंदीच्या कारणावरून झालेल्या वादातून सोमवारी रात्री शेकाडो पोलिसांनी ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केली होती. यात अनेकांच्या घरांचेही पोलिसांनी नुकसान केले. पंचनाम्यानुसार लतीफ पठाण यांच्या घराचा चौकटीसह दरवाजा तुटून व स्वयंपाक घरातील अन्नधान्याची नासधूस झाली आहे. लहूराज रामभाऊ गुंड, युवराज बाबू माने, भैरु गोविंद भंडारकर, विजयकुमार गोविंद भंडारकर, दादासाहेब गोविंद भंडारकर, व्यंकट हरीबा धाराव, सुरेश दगडू माने, श्रीमंत अर्जुन इंगळे, वजीर इस्माईल शेख, अभिमन्यू इंगळे, नितीन हरिदास इंगळे, बाबूलाल अंबीर शेख, संजय शंकर धस, लक्ष्मण तुळशीराम गुजरे, अरुण पल्हाद इंगळे, रामराव नाना धाराव व लालासाहेब व इकाम शेख आदींच्या घराचेही पोलिसांनी नुकसान केले आहे.