शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

जिल्हा काॅंग्रेस कमिटीने नोंदविला भाजप सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

उस्मानाबाद : भाजपा सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात ...

उस्मानाबाद : भाजपा सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविला. तसेच केंद्रातील भाजपप्रणित सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.

३० मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सत्तेत येण्याअगोदर देशातील जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून व वचननाम्यात प्रलोभने दाखवून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर देशातील गोरगरीब जनतेच्या हिताच्या योजना अमलात आणण्याऐवजी बड्या उद्योगपतींसाठीच सत्तेचा वापर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षांत देशाचा विकास करण्याऐवजी देश भकास केल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकाराचा निषेध नोंदविला.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले. तसेच लसीकरणातही ते अपयशी ठरलेले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढते भाव आणि महागाईही दिवसेंदिवस वाढत आहे. देशाची ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची दुर्दशा झाली. त्यामुळे बेरोजगारीही वाढली. त्यामुळे सर्वच घटकांत केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष पसरला आहे. त्यातच मागील वर्षी शेतकरीविरोधी काळे कायदे लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की ओढवली आहे. असे असतानाही नरेंद्र मोदी यांनी देशातील दोन उद्योगपतींसाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनल. पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विक्रीस काढल्याने देशाचा विकास थांबला आहे. देशाच्या हितासाठी केंद्रातील भाजपाप्रणित सरकार बरखास्त करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.

या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, विश्वास शिंदे, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, मुख्य संघटक राजेंद्र शेरखाने, लक्ष्मण सरडे, अश्निवेश शिंदे, राज कुलकर्णी, रोहित पडवळ, मुकुंद पाटील, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, संजय गजधने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.