शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

गर्दीला आवर घालण्यासाठी पथक तैनात करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

कळंब - कोरोनाच्या नियंत्रणासाठी गर्दी होणाऱ्या रस्त्यावर कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय इटकूर ग्रामपंचायतीने घेतला आहे. या माध्यमातून ...

कळंब - कोरोनाच्या नियंत्रणासाठी गर्दी होणाऱ्या रस्त्यावर कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय इटकूर ग्रामपंचायतीने घेतला आहे. या माध्यमातून रस्त्यांवरील गर्दी कमी हाेण्यास मदत हाेईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

तालुक्यातील लोकसंख्या व आकाराने मोठ्या असलेल्या गावांतही कोरोनाचा प्रकोप वाढत चालला. शिराढोण, मोहा येथील स्थितीचे अवलोकन करीत इटकूर येथील ग्रामपंचायतने सद्य:स्थितीत नियंत्रित असलेल्या आपल्या गावातील स्थिती बिघडू द्यायची नाही, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यानुसार ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या मैदानात बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच विलास गाडे, ग्रामविकास अधिकारी बाबूभाई शेख, तलाठी प्रवीण पालखे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आडसूळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर बावळे यांच्यासह सर्व शिक्षक, आशाताई, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत रुग्णसंख्या, तपासणी, ट्रेसिंग, पर्यवेक्षकांची कामे यांविषयी चर्चा करीत करण्यात आली. अडचणी जाणून घेत पुढील काळातील रणनीती ठरविण्यात आली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना सोबत घेत प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.

चौकट...

वर्दळीच्या ठिकाणी पथक थांबणार

इटकूर येथील बाजार मैदान, ग्रामपंचायतीचा परिसर, शिवाजी चौक, बसस्टँड, आदी भागांत अकारण गर्दी केली जाते. या भागासह गावाचे एंट्री पॉइंट असणाऱ्या भागांत कोरोना कक्षातील शिक्षकांचे पथक तैनात राहणार आहे. त्यांना ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. यात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्षही सोबत असणार आहेत. यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.

कट्ट्यावर, ओट्यावर काळे वंगण

सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास गावातील बाजारकट्टे, दारासमोरील ओटे, बाकडे यांवर सोशल डिस्टन्स न पाळता अकारण बसणाऱ्यांची संख्या काबूत आणण्यासाठी ग्रामपंचायतीने अशा जागांवर काळे, जळालेले वंगण, ऑईल टाकण्याचा निर्णय घेत त्याचा अंमल सुरू केला आहे. यामुळे रिकामटेकड्यांना थोडाबहुत आळा बसणार आहे.

गावात दवंडी अन् रूट मार्च

‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रमांतर्गत गावातील लोकांना सूचना देण्यासाठी दुचाकीवरून दवंडी देण्यात आली. याशिवाय सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी गावातील प्रमुख भागांत रूट मार्च केला. कडक व दंडात्मक कारवाईसंदर्भात ग्रामस्थांना यावेळी अवगत करण्यात आले.