शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

लसीकरणासाठी शहरी भागातील नागरिकांची ग्रामीण भागात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

तेर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने ...

तेर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शहरी भागातील नागरिक मोबाइलद्वारे नोंदणी करतात. परंतु, पुरेशा ज्ञानाअभावी ग्रामीण भागातील नागरिक मोबाइलवरून नोंदणी करू शकत नाही. परिणामी लसीकरणासाठी शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यातच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. यासाठी शासनाच्या वेबसाइडवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे स्लाँट १० व ११ मे या दोन दिवसांचे बुक झाले आहेत. लसीकरणाची पद्धत ऑनलाइन केल्यामुळे शहरी भागातील नागरिक मोबाइलवर नोंदणी करतात. परंतु, पुरेसे ज्ञान नसल्याने खेड्यातील नागरिक ऑनलाइन करू शकले नाहीत. काही तरुण ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी धावपळ करीत होते. मात्र, लसीकरणासाठीची साइड ओपन होत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

१० मे रोजी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात २५० लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला. त्यामध्ये तेर येथील केवळ २० जणांचा समावेश आहे, तर उर्वरित लाभार्थी उस्मानाबाद शहरासह औरंगाबाद, मुरूड, लातूर, भोसा येथील होते.

परजिल्ह्यातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे खेड्यातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(चाैकट)

ई-पासच्या आदेशाचे उल्लंघन?

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाने परजिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना ई-पास आवश्यक केला आहे. त्यानुसार सध्या परजिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना ई-पास काढून प्रवेश दिला जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात परजिल्ह्यातील नागरिक आले होते. त्यांनी ई-पास काढून प्रवेश केला का, हेदेखील तपासणी करणे आवश्यक आहे.