शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी शहरी भागातील नागरिकांची ग्रामीण भागात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

तेर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने ...

तेर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शहरी भागातील नागरिक मोबाइलद्वारे नोंदणी करतात. परंतु, पुरेशा ज्ञानाअभावी ग्रामीण भागातील नागरिक मोबाइलवरून नोंदणी करू शकत नाही. परिणामी लसीकरणासाठी शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यातच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. यासाठी शासनाच्या वेबसाइडवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे स्लाँट १० व ११ मे या दोन दिवसांचे बुक झाले आहेत. लसीकरणाची पद्धत ऑनलाइन केल्यामुळे शहरी भागातील नागरिक मोबाइलवर नोंदणी करतात. परंतु, पुरेसे ज्ञान नसल्याने खेड्यातील नागरिक ऑनलाइन करू शकले नाहीत. काही तरुण ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी धावपळ करीत होते. मात्र, लसीकरणासाठीची साइड ओपन होत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

१० मे रोजी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात २५० लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला. त्यामध्ये तेर येथील केवळ २० जणांचा समावेश आहे, तर उर्वरित लाभार्थी उस्मानाबाद शहरासह औरंगाबाद, मुरूड, लातूर, भोसा येथील होते.

परजिल्ह्यातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे खेड्यातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(चाैकट)

ई-पासच्या आदेशाचे उल्लंघन?

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाने परजिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना ई-पास आवश्यक केला आहे. त्यानुसार सध्या परजिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना ई-पास काढून प्रवेश दिला जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात परजिल्ह्यातील नागरिक आले होते. त्यांनी ई-पास काढून प्रवेश केला का, हेदेखील तपासणी करणे आवश्यक आहे.