शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘सुशीलादेवी’च्या ठेवीदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : येथील सुशीलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवी परत न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आता या पतसंस्थेत ...

उस्मानाबाद : येथील सुशीलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवी परत न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आता या पतसंस्थेत ५० हजारांच्या आतील ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे उपनिरीक्षक वाय. बी. खटके यांनी कळविले आहे. उस्मानाबाद येथील सुशीलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र, मुदत संपूनही ठेवी मिळत नसल्याने काही ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. याप्रकरणी संचालक मंडळावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण तपासासाठी सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. यातील आरोपी संचालक हे जामिनावर सोडण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाने या पतसंस्थेत ५० हजार रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना दिलासा देत त्यांची रक्कम परत देण्याचे आदेश पतसंस्थेस दिले आहेत. याअनुषंगाने आथिक गुन्हे शाखेने ठेवीदारांना आवाहन केले आहे. ५० हजार रुपयांच्या आतील तसेच ५० हजार रुपयांच्या वरील ठेवी असलेल्या ग्राहकांनी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण कागदपत्रांसह स्वत: पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन उपनिरीक्षक वाय. बी. खटके यांनी केले आहे.