शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST

केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिमेवर मागील शंभर दिवसापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. ...

केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिमेवर मागील शंभर दिवसापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. या शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी देशभरात काँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांच्या विरोधामध्ये एक कायदा केलेला आहे. तसेच सध्या देशामध्ये पेट्रोलचा शंभर रुपये आणि डिझेल ८८ रुपये प्रति लीटरप्रमाणे विकले जात आहे. इतकी प्रचंड दरवाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता जवळजवळ १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेले असताना केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या आंदोलकांकडे दुर्लक्ष केलेले आहे. देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. कामगार कायद्यांमध्ये बदलामुळे आणि त्यामधील जाचक तरतुदींमुळे देशातील कामगार देशोधडीला लागणार असल्याने हे कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, राजाभाऊ शेरखाने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.