शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

अधीक्षक पाटलांना मुख्य अभियंत्यांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : सध्या महावितरणकडून कृषी योजनेंतर्गत पात्र वीज ग्राहकांकडील वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. यात उस्मानाबादमुळे मंडळाची कामगिरी खराब ...

उस्मानाबाद : सध्या महावितरणकडून कृषी योजनेंतर्गत पात्र वीज ग्राहकांकडील वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. यात उस्मानाबादमुळे मंडळाची कामगिरी खराब होत असल्याचा दावा करीत, लातूरच्या मुख्य अभियंत्यांनी येथील अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील पाटील यांना धारेवर धरत शुक्रवारी खरमरीत पत्र दिले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत पात्र वीज ग्राहकांची संख्या ही १ लाख ५० हजार ७१० इतकी आहे. या वीज ग्राहकांकडे मार्च, २०२० अखेर १ हजार १०८ कोटी रुपयांची थकबाकी आहे, तसेच सप्टेंबर, २०२० अखेर आणखी ४४ कोटी रुपयांची त्यात चालू बाकीमध्ये भर पडली. एकीकडे थकबाकीची ही रक्कम वाढत चालल्याने महावितरणने सध्या जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यांना वसुलीची उद्दिष्टेही देण्यात आली आहेत. उस्मानाबाद विभागासाठी ५९८ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५ मार्चपर्यंत या विभागाने केवळ १ कोटी १७ लाख रुपये चालू बिल वसुली केली, तर थकबाकीतील केवळ ९६ लाख वसूल केले आहेत. ५९८ कोटींच्या तुलनेत एकूण केवळ २ कोटी १३ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे. हे प्रमाण अत्यल्प म्हणजेच ०.३६ टक्के इतके आहे. ही कामगिरी असामाधानकारक असल्याचा ठपका लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रवींद्र कोलप यांनी उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्यावर ठेवला आहे. वरिष्ठ कार्यालयाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगतानाच, कोलप यांनी उस्मानाबादच्या खराब कामगिरीचा लातूर परिमंडळाच्या कामगिरीवर विपरित परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे. मुख्य अभियंत्यांच्या या खरमरीत पत्रामुळे उस्मानाबाद महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा...

उस्मानाबाद विभागाच्या असामाधानकारक वसुलीवर मुख्य अभियंता कोलप यांनी नाराजी व्यक्त करतानाच, अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना वसुली वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करून कार्यवाही करण्याची सूचना केली, तसेच सात दिवसांच्या आत या वाईट कामगिरीबाबतचा खुलासा सादर करावा, अन्यथा आपल्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही कोलप यांनी पाटील यांना दिला आहे.