शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारविरुद्ध भाजपकडून शंखनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : पीक विमा, वीज तोडणी तसेच इतरही मुद्दे घेऊन भाजप आता आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. जिल्हाभर ...

उस्मानाबाद : पीक विमा, वीज तोडणी तसेच इतरही मुद्दे घेऊन भाजप आता आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. जिल्हाभर बूथनिहाय बैठका घेऊन जनमानसात सरकारची निष्क्रियता पेरण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या बैठकांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी जवळपास ७५ ठिकाणी हा उप्रकम राबविण्यात आला.

संघटन आणखी मजबूत करतानाच या शक्तीकेंद्र बैठकीतून आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला जात आहे. आ. सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारपासून या बैठका सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत काजळा व उपळा येथून या उप्रकमास सुरुवात करण्यात आली. येथे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जिल्ह्यातून ५८० कोटींचा पीक विमा भरला गेला असताना केवळ अटींचा बाऊ करीत ८० कोटींच भरपाई दिली. बाकीचे ५०० कोटी कोणाच्या घशात गेले. निसर्ग व कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या रोज घटना घडत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाविषयी व आता नव्यानेच समोर आलेल्या ओबीसी आरक्षणाविषयी आघाडी सरकार खंबीर भूमिका घेत नसल्याने समाजात अस्वस्थता पसरली आहे. या सरकारच्या बेफिकीर कारभाराला लोक वैतागले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी बैठका घेऊन जागृती केली जात असल्याचेही काळे म्हणाले. हा उपक्रम २५ मार्चपर्यंत चालणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, प्रवीण पाठक, प्रवीण पाटील, नाना मडके, रामचंद्र कदम, मनोज कदम, सोमनाथ पवार, जगन्नाथ क्षीरसागर, प्रदीप शेळके, राहुल खोचरे, विकास राऊत, चंद्रकांत इंगळे, बप्पा पडवळ, बाबू पडवळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.