शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

आघाडी सरकारविरुद्ध भाजपकडून शंखनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : पीक विमा, वीज तोडणी तसेच इतरही मुद्दे घेऊन भाजप आता आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. जिल्हाभर ...

उस्मानाबाद : पीक विमा, वीज तोडणी तसेच इतरही मुद्दे घेऊन भाजप आता आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. जिल्हाभर बूथनिहाय बैठका घेऊन जनमानसात सरकारची निष्क्रियता पेरण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या बैठकांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी जवळपास ७५ ठिकाणी हा उप्रकम राबविण्यात आला.

संघटन आणखी मजबूत करतानाच या शक्तीकेंद्र बैठकीतून आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला जात आहे. आ. सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारपासून या बैठका सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत काजळा व उपळा येथून या उप्रकमास सुरुवात करण्यात आली. येथे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जिल्ह्यातून ५८० कोटींचा पीक विमा भरला गेला असताना केवळ अटींचा बाऊ करीत ८० कोटींच भरपाई दिली. बाकीचे ५०० कोटी कोणाच्या घशात गेले. निसर्ग व कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या रोज घटना घडत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाविषयी व आता नव्यानेच समोर आलेल्या ओबीसी आरक्षणाविषयी आघाडी सरकार खंबीर भूमिका घेत नसल्याने समाजात अस्वस्थता पसरली आहे. या सरकारच्या बेफिकीर कारभाराला लोक वैतागले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी बैठका घेऊन जागृती केली जात असल्याचेही काळे म्हणाले. हा उपक्रम २५ मार्चपर्यंत चालणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, प्रवीण पाठक, प्रवीण पाटील, नाना मडके, रामचंद्र कदम, मनोज कदम, सोमनाथ पवार, जगन्नाथ क्षीरसागर, प्रदीप शेळके, राहुल खोचरे, विकास राऊत, चंद्रकांत इंगळे, बप्पा पडवळ, बाबू पडवळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.