शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

लसीकरणासाठी मोठी सुई, वेस्टेजमुळे पळता भुई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : कोरोना महामारीच्या काळात लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात तुटवडा ...

उस्मानाबाद : कोरोना महामारीच्या काळात लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक स्तरावर सिरिंज वापरण्याची मुभा आरोग्य विभागास दिली आहे. त्यामुळे आता ०.५ एम.एल मार्किंग असलेले सिरिंज वापरले जात आहे. सध्या वेस्टचे प्रमाण कमी आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरण व बालकांचे लसीकरण नियमित सुरू आहे. लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला आहे. जिल्ह्यास काही प्रमाणात एडी तर २ सीसी सिरिंज उपलब्ध होत आहेत. लसीकरण सुरळीत सुरू राहावे, यासाठी स्थानिक स्तरावर सिरिंज खरेदीसाठी शासनाने २६ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. लसीकरणासाठी ०.५ एम.एल मार्किंग असलेले सिरिंज वापरण्यास परवानगी आहे. वेस्टचे प्रमाण कमी आहे.

काय आहे एडी सिरिंज

एडी ही अशी सिरिंज आहे की, जी एकदाच वापरली जाते. ज्यामध्ये ऑटो डिजेबल असते. विशेष म्हणजे ही एडी सिरिंज परत वापरताही येत नाही.

२ सीसी सिरिंज कशी असते

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून एडी सिरिंज पुरवठा कमी झाल्याने बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत आहे. या सिरिंजमध्ये द्रावण घेतल्यानंतर त्यातील एअर काढण्यासाठी काही द्रावण वाया जाते. त्यामुळे लसींचे वेस्टेज वाढण्याची शक्यता आहे. ही सुई काही जाडही असते.

१०००० सिरिंज लागतात रोज जिल्ह्याला

जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसी प्राप्त होत आहेत. सध्या प्रतिदिन १० हजाराच्या जवळपास लस टोचली जात आहे. त्यासाठी १० हजार सिरिंज लागत आहेत.

कोट...

केंद्र सरकारने आता लसीकरणासाठी सिरिंज तुटवडा निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर सिरिंज घेण्याची मुभा दिली आहे. त्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. या सुईमधून व्यवस्थित लसीकरण सुरू आहे.

डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी.

वेस्टेज वाढण्याची शक्यता

आपोआप ०.५ एम.एल. लस घेणारी सिरिंज उपलब्ध नसल्याने लस वेस्टेजचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे; परंतु सध्या वेस्टेजचे प्रमाण मायनस आहे. खबरदारी घेऊन नागरिकांना लस दिली जात आहे.