शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीबीएफ पद्धत ठरतेय शेतकऱ्यांना वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

बाबू खामकर पाथरुड : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने ...

बाबू खामकर

पाथरुड : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने मागील हंगामापासून शेतकऱ्यांना बीबीएफ रूंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. याचा चांगला फायदा या हंगामात दिसून येत आहे.

या परिसरात खरीप हंगामात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु, निसर्गाच्या भरवशावरच कोरडवाहू शेती, पावसाची अनियमितता, दिवसेंदिवस उत्पादन खर्चात होत असलेली वाढ अन्‌ उत्पन्नातील घट यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. ईट कृषी मंडळात मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून पहिल्यांदाच बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर यंत्र जोडणी ते पेरणी पर्यंत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. याचा फायदा घेऊन काही शेतकऱ्यांनी या नवीन पद्धतीचा अवलंब देखील केला. मागील वर्षी जवळपास १०० एकर क्षेत्रावर अशी पेरणी झाली. यातून आलेल्या चांगल्या अनुभवामुळे या हंगामात जवळपास हजाराहून अधिक एक क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी झाली आहे. यासोबतच या हंगामात कृषी विभागाने पुढाकार घेऊन जवळपास २५ एकर क्षेत्रावर टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडीचाही प्रयोग केला आहे.

बीबीएफ यंत्र उपलब्धता कमी असल्याने पारंपरिक पेरणी यंत्राला फाळ बसवून तसेच पेरणी यंत्राचा एक नळा बंद करून स्थानिक परिस्थितीनुसार बीबीएफ पद्धत करण्यासाठी कृषी विभागाने घेतलेल्या प्रयत्नाला यश आले व मोठ्या क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी शक्य झाली. बैल चलित तिफणीने सुद्धा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविल्याने तेही क्षेत्र या हंगामात वाढले आहे. सुरुवातीला या नवीन तंत्रज्ञानाबाबत अपुरी माहिती, गैरसमज व यंत्राची अनुपलब्धता यामुळे शेतकरी याचा अवलंब करण्यास सकारात्मक नव्हते. परंतु, प्रत्यक्ष अनुभव व उत्पन्न वाढ पाहून अधिकाधिक शेतकरी बीबीएफ तसेच टोकन पद्धतीकडे वळताना दिसत आहे.

कोट.....

बियाणे बचत, अतिरिक्त पाण्याचा सरीमध्ये निचरा, पावसाच्या खंडात गादी वाफ्यावर ओलावा टिकून राहणे, मोकळ्या ओळीतून सुलभतेने फवारणी करणे, मुबलक सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिल्याने पिकाची जोमदार वाढ होणे, उत्पादनात एकरी २ ते ३ क्विंटल हमखास वाढ आदी फायद्यांचा प्रत्यक्ष अनुभवामुळे शेतकरी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्यास सकारात्मक आहेत.

- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी, ईट