शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

बीबीएफ पद्धत ठरतेय शेतकऱ्यांना वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

बाबू खामकर पाथरुड : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने ...

बाबू खामकर

पाथरुड : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने मागील हंगामापासून शेतकऱ्यांना बीबीएफ रूंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. याचा चांगला फायदा या हंगामात दिसून येत आहे.

या परिसरात खरीप हंगामात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु, निसर्गाच्या भरवशावरच कोरडवाहू शेती, पावसाची अनियमितता, दिवसेंदिवस उत्पादन खर्चात होत असलेली वाढ अन्‌ उत्पन्नातील घट यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. ईट कृषी मंडळात मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून पहिल्यांदाच बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर यंत्र जोडणी ते पेरणी पर्यंत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. याचा फायदा घेऊन काही शेतकऱ्यांनी या नवीन पद्धतीचा अवलंब देखील केला. मागील वर्षी जवळपास १०० एकर क्षेत्रावर अशी पेरणी झाली. यातून आलेल्या चांगल्या अनुभवामुळे या हंगामात जवळपास हजाराहून अधिक एक क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी झाली आहे. यासोबतच या हंगामात कृषी विभागाने पुढाकार घेऊन जवळपास २५ एकर क्षेत्रावर टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडीचाही प्रयोग केला आहे.

बीबीएफ यंत्र उपलब्धता कमी असल्याने पारंपरिक पेरणी यंत्राला फाळ बसवून तसेच पेरणी यंत्राचा एक नळा बंद करून स्थानिक परिस्थितीनुसार बीबीएफ पद्धत करण्यासाठी कृषी विभागाने घेतलेल्या प्रयत्नाला यश आले व मोठ्या क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी शक्य झाली. बैल चलित तिफणीने सुद्धा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविल्याने तेही क्षेत्र या हंगामात वाढले आहे. सुरुवातीला या नवीन तंत्रज्ञानाबाबत अपुरी माहिती, गैरसमज व यंत्राची अनुपलब्धता यामुळे शेतकरी याचा अवलंब करण्यास सकारात्मक नव्हते. परंतु, प्रत्यक्ष अनुभव व उत्पन्न वाढ पाहून अधिकाधिक शेतकरी बीबीएफ तसेच टोकन पद्धतीकडे वळताना दिसत आहे.

कोट.....

बियाणे बचत, अतिरिक्त पाण्याचा सरीमध्ये निचरा, पावसाच्या खंडात गादी वाफ्यावर ओलावा टिकून राहणे, मोकळ्या ओळीतून सुलभतेने फवारणी करणे, मुबलक सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिल्याने पिकाची जोमदार वाढ होणे, उत्पादनात एकरी २ ते ३ क्विंटल हमखास वाढ आदी फायद्यांचा प्रत्यक्ष अनुभवामुळे शेतकरी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्यास सकारात्मक आहेत.

- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी, ईट