शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली ...

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ६९ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५०३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत बँका पीककर्ज वाटपात मेहरबान झाल्या असून, वर्षभरात १ लाख ५१ हजार ६७० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात पीककर्ज वाटप केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा बँकेस कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असते. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड राहिल्यामुळे अनेक बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास नकारघंटा दर्शवीत असल्याचे दिसून येत होते. मात्र, गतवर्षी महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ६९ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५०३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. कर्जमाफीमुळे बँका शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी पुढे सरसावल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या वर्षभरात १ लाख ५१ हजार ६७० शेतकऱ्यांना ११८६ कोटी १५ लाखांचे कर्ज वितरण झाले.

पीक कर्जाची आकडेवारी

२०१६-१७ १६४१७०

११६९३४

२०१७-१८ १८६७६३

६४७५७

२०१८-१९ १९७१०३

७३३६७

२०१९-२० २२७२२२

६०७२१

२०२०-२१ २२७२२२

११८६१५

६९,५८२

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या

कोट...

जिल्ह्यातील बँकांना या वर्षी २ हजार २७२ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत १ लाख ५१ हजार ७६० शेतकऱ्यांना १ हजार १८९ कोटी २२ लाखांचे पीककर्ज वितरित केले आहे. या वर्षी मागील चार वर्षांच्या तुलनेत अधिक कर्जवाटप वाढले आहे.

- नीलेश विजयकर, अग्रणी बँक प्रबंधक, उस्मानाबाद

प्रतिक्रिया...

१ लाख ७० हजार रुपयांचे बँकेकडून पीक कर्ज घेतले होते. मे २०२० मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफ झाले आहे. त्यानंतर मे महिन्यात बँकेकडे पीककर्जाची मागणी केली होती. बँकेने १ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्ज दिले आहे.

- बळीराम सावंत, शेतकरी, वलगुड

शेतीकामासाठी बँकेकडून १ लाख ३२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. दुष्काळ, नापिकीमुळे कर्जफेड झाली नाही. शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमुक्ती मिळाली. या वर्षी बँकेने दीड लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.

- धोंडीराम बिराजदार, शेतकरी, सुतपगाव