शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
3
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
4
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
5
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
6
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
7
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
8
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
9
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
10
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
15
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
16
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
17
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
18
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
19
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
20
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली ...

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ६९ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५०३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत बँका पीककर्ज वाटपात मेहरबान झाल्या असून, वर्षभरात १ लाख ५१ हजार ६७० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात पीककर्ज वाटप केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा बँकेस कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असते. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड राहिल्यामुळे अनेक बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास नकारघंटा दर्शवीत असल्याचे दिसून येत होते. मात्र, गतवर्षी महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ६९ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५०३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. कर्जमाफीमुळे बँका शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी पुढे सरसावल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या वर्षभरात १ लाख ५१ हजार ६७० शेतकऱ्यांना ११८६ कोटी १५ लाखांचे कर्ज वितरण झाले.

पीक कर्जाची आकडेवारी

२०१६-१७ १६४१७०

११६९३४

२०१७-१८ १८६७६३

६४७५७

२०१८-१९ १९७१०३

७३३६७

२०१९-२० २२७२२२

६०७२१

२०२०-२१ २२७२२२

११८६१५

६९,५८२

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या

कोट...

जिल्ह्यातील बँकांना या वर्षी २ हजार २७२ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत १ लाख ५१ हजार ७६० शेतकऱ्यांना १ हजार १८९ कोटी २२ लाखांचे पीककर्ज वितरित केले आहे. या वर्षी मागील चार वर्षांच्या तुलनेत अधिक कर्जवाटप वाढले आहे.

- नीलेश विजयकर, अग्रणी बँक प्रबंधक, उस्मानाबाद

प्रतिक्रिया...

१ लाख ७० हजार रुपयांचे बँकेकडून पीक कर्ज घेतले होते. मे २०२० मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफ झाले आहे. त्यानंतर मे महिन्यात बँकेकडे पीककर्जाची मागणी केली होती. बँकेने १ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्ज दिले आहे.

- बळीराम सावंत, शेतकरी, वलगुड

शेतीकामासाठी बँकेकडून १ लाख ३२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. दुष्काळ, नापिकीमुळे कर्जफेड झाली नाही. शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमुक्ती मिळाली. या वर्षी बँकेने दीड लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.

- धोंडीराम बिराजदार, शेतकरी, सुतपगाव