शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

महावितरणच्या कार्यालयास ठाेकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST

लोहारा (जि. उस्मानाबाद) : दोन महिन्यांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ...

लोहारा (जि. उस्मानाबाद) : दोन महिन्यांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिप्परगा (रवा) येथील शेतकर्यांनी वीज कंपनीच्या उपविभागीय कार्यालयास बुधवारी टाळे ठाेकले.

लोहारा उपविभागीय वीज वितरण कंपनीने कृषिपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून ६८ रोहित्र बसवले आहेत. परंतु, या फिडरवरूनच इतर तीन गावांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे फिडरवर अतिरिक्त भार पडत असल्याने रोहित्र सतत नादुरुस्त होणे, तांत्रिक बिघाड येणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा होत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोअर, विहिरी, साठवण तलाव तसेच पाझर तलावांत मुबलक पाणी आहे. असतानाही पिकांना देणे कठीण झाले आहे. परिणामी हरभरा, ज्वारी, गहू आदी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या हिप्परगा (रवा) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे ठाेकले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काहीकाळ तणाव निर्माण झाल्याने पाेलिसांना पाचारण करण्यात आले. सुरळीत वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. हे आंदाेलन तीन तास चालले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच विजय लोमटे, संजय नरगाळे, धर्मवीर जाधव, नारायण क्षीरसागर, जीवन होनाळकर, विनोद मोरे, मनोज गवळी, तानाजी नरगाळे, ज्ञानेश्वर मोरे, संजय नरगाळे, अनिल आतनुरे, उमेश गिराम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.