शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

‘समांतर’चा प्रकल्प अहवाल तयार करण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यतेखाली मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विशेष सभेला सुरुवात झाली. प्रारंभी नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी ...

नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यतेखाली मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विशेष सभेला सुरुवात झाली. प्रारंभी नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी समांतर पाणी पुरवठा याेजनेची का गरज आहे? हे सभागृहासमाेर मांडले. एक-दाेन वर्षाआड पडणारा दुष्काळ व कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील अन्य प्रकल्पातून राबविण्यात आलेल्या याेजनांद्वारे पुरेसा पाणी पुरवठा हाेत नाही. त्यामुळेच २००९ मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या ‘यूआयडीएसएसएमटी’अंतर्गत सुमारे ११५ किमी अंतरावरील उजनी प्रकल्पावरून याेजना राबविण्यात आली. या याेजनेद्वारे दरराेज ८ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित हाेते; परंतु शहराच्या वाढत्या लाेकसंख्येमुळे या याेजनेचे पाणी शहराला कमी पडू लागले आहे. २०२१ पर्यंतची लाेकसंख्या विचारात घेता शहराला २६ एमएलडी पाण्याची गरज आहे. ही निकड लक्षात घेऊन अमृत याेजनेंतर्गत उजनी पाणी याेजनेची क्षमता वाढ करण्यास मंजुरी मिळाली. प्रतिदिन १६ एमएलडी पाणी उचलण्यासाठीच्या यंत्रणेचा यात अंतर्भाव हाेता. हे कामदेखील पूर्ण झाले आहे. तर उर्वरित १० एमएलडी पाणी तेरणा व रूईभर धरणातून मिळेल, असे गृहित धरले हाेते; परंतु सततच्या दुष्काळामुळे तेवढे पाणी मिळत नाही. त्यामुळे आता पुढील ३० वर्षातील लाेकसंख्या विचारात घेऊन शहरासाठी थेट उजनी धरणातूनच समांतर याेजना राबविण्याची गरज आहे. यासाठी सर्वप्रथम प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल, असे ते म्हणाले. त्यानुषंगाने ठराव मांडला असता, सत्ताधारी तसेच विराेधी बाकावरील सदस्यांनी मंजुरी दिली. हे काम युद्धपातळीवर करून घेण्याचे निर्देश नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना दिले. सभेला उपनगराध्यक्ष अभय इंगळे, सीओ येलगट्टे यांच्यासह सदस्य उपस्थित हाेते.

चाैकट..

खासगी एजन्सी नेमण्यास विराेध...

समांतर पाणी याेजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम जीवन प्राधिकरणास दिल्यास वेळेत अहवाल मिळणार नाही, असे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी सांगितले. यापूर्वी आलेले अनुभवही त्यांनी सभागृहासमाेर मांडले, तसेच अनुभव गटनेते युवराज नळे, राजाभाऊ पवार, खलिफा कुरेशी, प्रदीप मुंडे यांनी कथन केले. त्यामुळे हे काम खासगी यंत्रणेकडून करण्याचे बहुमताने ठरले. पूर्वी एका एजन्सीने काहीअंशी हे काम केले आहे. त्यांच्याकडून ते पूर्ण करून घेण्याचे ठरले; मात्र स्वीकृत सदस्य उदय निंबाळकर यांनी विराेध दर्शविला. जीवन प्राधिकरणाकडेच हे काम द्यायचे, असे त्यांचे म्हणणे हाेते. तसा त्यांचा विराेध नाेंदविण्यात आला.

अहवाल येताच घेणार तांत्रिक मान्यता

समांतर पाणी पुरवठा याेजनेचा प्रकल्प अहवाल येताच त्यास तांत्रिक मान्यता घेण्यात येणार आहे. ही मान्यता घेतल्यानंतरच प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी सभागृहासमाेर स्पष्ट केले.