शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कृषीमंत्रीजी, हेच का तुमचे ‘खंजीर’ धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST

उस्मानाबाद : गतवर्षीचा पीक विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करीत असतानाच आता पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसान झाले आहे. याबाबत २५ ...

उस्मानाबाद : गतवर्षीचा पीक विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करीत असतानाच आता पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसान झाले आहे. याबाबत २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई देण्यासाठी अधिसूचनाही निघाली; मात्र हालचाली काहीच नाहीत. राज्यस्तरीय समितीकडे याची सुनावणीही होत नाही. कंपन्यांची पाठराखण अन् शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर, हेच का तुमचे धोरण, असा सडेतोड सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी कृषीमंत्री दादा भुसे यांना पत्राद्वारे विचारला आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. महसूल व कृषीच्या पंचनाम्यातून हे स्पष्टही झाले होते. तरीही विमा कंपनीने ४०० कोटी हप्ता गोळा करुन केवळ ५५ कोटींची नुकसानभरपाई दिली. अजूनही ३ लाखांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. यावर्षीही झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम देण्याबाबत हालचाली होत नाहीत. यासाठी कृषीमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करुनही काहीच होत नसल्याने त्यांच्या भूमिकेवरच आ. पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. पत्रातून त्यांनी कंपनीचा करार हा राज्य शासनासोबत होतो, हे करारपत्र जोडून अधोरेखित केले आहे. करारानुसार महसूल व कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरणे जरुरी असतानाही कंपनी त्यास जुमानत नाही. यावर शासन काहीच करीत नाही. करारानुसारच कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीला तक्रारींच्या अनुषंगाने बैठक घेण्याचा व आदेश देण्याचा अधिकार आहे; मात्र हेही काम झाले नाही. करारानुसार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करणे आवश्यक असून, या समितीचीही याबाबतीत अद्याप एकही बैठक झालेली नाही. तेव्हा कृषीमंत्री म्हणून आपण या संवेदनशील विषयाबाबत विमा कंपनी बरोबर केलेल्या कराराच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शेतकऱ्यांच्या हिताची नेमकी कुठली कृती केली आहे, राज्य सरकार व विमा कंपनीत नेमका कोणता कॉमन मिनीमम प्राेग्रॅम ठरलाय, असा प्रश्नही आ. पाटील यांनी पत्रातून विचारला आहे.

खंडपीठात खाचिका, भूमिका मांडा...

पीक विम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे. ७ सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होऊन राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तेव्हा या वेळेत अन्नदात्यांचे ऋण फेडण्यासाठी तत्काळ राज्यस्तरीय तक्रार समितीची बैठक लावावी. अन्यथा आपण शेतकऱ्यांचे नव्हे तर कंपन्यांचे प्रतिनिधी आहात, हे यातून स्पष्ट होईल, असा टोला आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषीमंत्री भुसे यांना लगावला आहे.