उस्मानाबाद : अपघातात मोडलेल्या आणि कारवाईदरम्यान सापडलेल्या शेकडो दुचाकी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडल्या आहेत़ शहर पोलिस ठाण्याच्या परिसरातही अशीच अवस्था दिसून येते़ चोरीस गेलेल्या आणि सापडलेल्या वाहनांचा अहवाल वरिष्ठांकडे जातो़ त्यामुळे चोरीचे वाहन परत नेण्याच्या हलचाली होतात़ मात्र, ज्या गाडीमालकाची ओळखच पटत नाही त्या मात्र, ठाण्याच्या आवारातच वर्षानुवर्षे कुजत पडतात़जिल्ह्यातील महामार्गांसह ग्रामीण भागातील मार्गावर सरासरी दररोज एक अपघात ठरलेला ! तर दुचाकी, चारचाकी चोऱ्यांच्या घटनाही वाढल्या आहेत़ अपघातात चक्काकूर झालेली वाहने संबंधित गाडीमालक न्यायालयातून सोडवून नेतो़ मात्र, अनेक गाड्यांचे मालक कोण याचा पत्ता लागू न शकलेल्या आणि अपघातात मोडलेल्या गाड्या नेण्याकडे अनेकांनी दूर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ गुन्ह्याचा तपास लागल्यानंतर संबंधित वाहनाचा मालक नसेल तर गाडीचा लिलाव न्यायालयाच्या सूचनेनुसार करण्यात येतो़ मात्र, जिल्ह्याच्या अनेक पोलिस ठाण्यात दुचाकींचा खच साचला असून, वर्षानुवर्षापासून त्या कुजत चालल्या आहेत़ अशा वाहनांचा लिलाव करण्याकडेही अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे़ या गाड्यांचा लिलाव झाला तर शासनाचाच महसूल वाढणार आहे़ त्यामुळे कुजणाऱ्या गाड्यांचा लिलाव करून गुंतलेली ठाण्याची जागाही मोकळी करण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)चोरीस गेलेल्या वाहनांची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल होताच वाहनाचा क्रमांक पोलिस दलामार्फत राज्यभर पसरतो़ तसेच पोलिसांना विविध कारवाईदरम्यान सापडलेली चोरीच्या वाहनांचाही अहवाल वरिष्ठांकडे जातो़ त्यामुळे चोरीस गेलेली व सापडलेली वाहने यांचे क्रमांक पाहिल्यानंतर तपासाअधिकाऱ्यासह वाहने मिळविण्यासाठी फिर्यादीही धावपळ करतो़ अनेक वाहनांना वालीच नसल्याने त्या मात्र पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडतात़
अगोदर फुटल्या़़ नंतर कुजल्या़़
By admin | Updated: July 15, 2014 00:53 IST