शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अणदूर येथे ‘माझी वसुंधरा’ अभियानास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

अणदूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात महाराष्ट्रातील ६६७ ग्रामपंचायती निवड झाली असून, यात ...

अणदूर : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात महाराष्ट्रातील ६६७ ग्रामपंचायती निवड झाली असून, यात दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अणदूर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या अंतर्गत येथे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जवळपास मागील दीड महिन्यांपासून संपूर्ण गाव यासाठी एकत्र आले आहे.

अणदूर गाव हे हरितक्रांती करण्यासाठी व ‘माझी वसुंधरा’ हे अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, पं.स. सदस्या वैशाली मुळे, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, महादेवाप्पा आलुरे, माणिकराव आलुरे, निलकंठ नरे, मारुती खोबरे व ग्रामपंचायत सदस्य, प्रभात मंडळातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘माझी वसुंधरा’बाबत सार्वजनिक शपथ घेतली. यानंतर, अणदूर येथील हुतात्मा स्मारक परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. कन्या शाळा, पणन संस्था परिसर, स्मशानभूमी परिसर, रस्त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ करून पाचशे वृक्षाची लागवड करण्यात आली. या वृक्षाच्या संरक्षणाची जबाबदारीही ग्रामपंचायत कार्यालयाने घेतली आहे. त्यामुळे गावात सुंदरतेमध्ये भर पडणार आहे.

सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, धनराज मुळे, बाळकृष्ण घोडके पाटील, डॉ.जितेंद्र कानडे, बालाजी घुगे, सरिता मोकाशे, डॉ.विवेक बिराजदार, गणेश सूर्यवंशी, गोदावरी गुड्ड, अनुसया कांबळे, मोतनबी इनामदार, जयश्री व्हटकर, देवकी चौधरी, उज्ज्वला बंदपट्टे, अनिता घुगरे या ग्रामपंचायत सदस्यांनी या अभियानांतर्गत दोन लाख रुपये लोकवाटा जमा करून, त्यातूनच जेसीबीच्या साह्याने खड्डे मारणे, वृक्ष लागवड करणे, ट्री गार्ड बसविणे, बायोगॅस प्लांट बसविणे, बोअरचे पुनर्भरण आदी कामे हाती घेतली आहेत. या अगोदर जलजागृती अभियानाच्या माध्यमातून या गावाने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण काम करून, लोकसहभाग व लोकवाट्यातून पाणी आडवा पाणी जिरवा, नाला खोलीकरण, सरळीकरणासाठी एकजूट दाखवून दिली होती. याच धर्तीवर ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या अंतर्गत आता ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हरितक्रांतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

फोटो : माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड व संगोपनाची शपथ घेतान जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण आदी.