शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आली हो आली... अतिवृष्टीची मदत आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून राज्य आपत्ती ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून दुसऱ्या टप्प्यातील मदत गुरुवारी जाहीर करून ती लागलीच जिल्ह्यांना वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच दुसऱ्या टप्प्यातील १३३ कोटी रुपये शेतकऱ्यांना वर्ग होतील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीत ४ लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानीपोटी २६७ कोटी ५७ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यातील दिवाळीपूर्वी आलेल्या आलेल्या पहिल्या टप्प्यात १३३ कोटी ६५ लाख रुपये बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. हा टप्पाही गुरुवारी शासनाने जाहीर केला आहे. यामध्ये यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे जिरायती पिकांसाठी नियमांनुसार प्रतिहेक्टरी मिळणाऱ्या ६ हजार ८०० रुपयांत शासनाने ३,२०० रुपयांची वाढ करून १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. प्रतिशेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपयांत ७ हजारांची वाढ करून २५ हजार रुपये देण्यात येत आहेत. यानुसार १३३ कोटी ६५ लाख रुपये जिल्ह्यास प्राप्त झाले. दुसऱ्या टप्प्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे ९१ कोटी ४ लाख, तर शासन निधीतून वाढीव ४२ कोटी ६१ लाख रुपये याप्रमाणे उपरोक्त रक्कम वितरित केली जाणार आहे.

कोट...

शासनाकडून प्राप्त होणारा निधी लागलीच तहसीलस्तरावर वितरित केला जाणार आहे. तेथून तो शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील मदत वितरित करताना बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत केलेली असल्याने वितरणासाठी फार वेळ लागणार नाही.

-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी