शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ८०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७० हजार १३८ लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, जवळपास ५०८ कोटी ...

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७० हजार १३८ लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, जवळपास ५०८ कोटी ५१ लाख रुपये कर्ज खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, १ हजार ८१९ शेतकऱ्यांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव रखडले आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांचा कर्ज खात्यावर शासनातर्फे वर्ग करण्यात येते. या योजनेअंतर्गत संबंधित बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या कर्जखात्यात रक्कम वळती करण्याची कार्यवाही सुरू होते. परंतु अद्याप जिल्ह्यातील १ हजार ८१८ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळला नाही. त्यामुळे संबंधितांनी लवकरात लवकर प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पॉईंटर...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात सहा याद्या प्रसिद्ध झाल्या असून, ७२ हजार ९६२ शेतकरी पात्र ठरले आहेत.

अद्यापर्यंत ७० हजार १३७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

तर १ हजार ८१९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. त्यामुळे कर्ममाफीपासून हे शेतकरी वंचित आहेत.

चौकट...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या एकूण ६ याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकूण ७२ हजार ९६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. अद्यापर्यंत ७० हजार १३८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५०८ कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम वर्ग झाली आहे. अद्याप १ हजार ११९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले असून, शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयात करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरण रखडलेले तालुकानिहाय शेतकरी

तालुका शेतकरी संख्या

उस्मानाबाद ४११

तुळजापूर २७२

उमरगा २५२

लोहारा ७०

कळंब ३५३

वाशी २३३

भूम १४६

परंडा ६२