शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कोरोना काळातही ७२ कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

जावेद इनामदार मुरूम : कोरोनामुळे अनेक बाजार समित्यांची आवक मंदावली आहे. आर्थिक उलाढालही ठप्प आहे. असे असताना उमरगा तालुक्यातील ...

जावेद इनामदार

मुरूम : कोरोनामुळे अनेक बाजार समित्यांची आवक मंदावली आहे. आर्थिक उलाढालही ठप्प आहे. असे असताना उमरगा तालुक्यातील मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र कोरोनाच्या काळात केलेले योग्य नियोजन, शेतमालाला मिळालेला योग्य भाव, यामुळे २०२० ते २०२१ या चालू वर्षात १ लाख ४८ हजार ४१४ क्विंटल शेतमालाची आवक होऊन ७२ कोटी ८५ लाख ७६ हजार ६८२ रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ३० कोटी ७१ लाख चार हजार १२४ रुपयांनी बाजार समितीची उलाढाल वाढली आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जिल्ह्यातील क्रमांक दोनची बाजार समिती म्हणून पाहिले जाते. या बाजार समितीत उमरगा, लोहारा, तुळजापूर, अक्कलकोट या शेजारील तालुक्यातील शेकडो गावासह कर्नाटकातील आळंद तालुक्यातील अनेक गावातील शेतमाल विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे मुरूम बाजार समितीत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. २०१९ ते २०२० या वर्षात ९५ हजार ३२६ क्विंटल धान्याची आवक होऊन ४२ कोटी ७८ लाख ६२ हजार ५५८ रुपयांची उलाढाल झाली होती. चालू हंगामात बाजार समितीमध्ये ५० हजार ८८ क्विंटलने आवक वाढली. २०२१ या वर्षात एक लाख ४८ हजार ४१४ क्विंटल आवक होऊन तब्बल ७२ कोटी ८५ लाख ७६ हजार ६८२ रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

सन २०१९ ते २०२० या काळात मुरूम बाजार समितीत १६ हजार ९८८ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली, तर तूर १८ हजार ९६४, उडीद १८ हजार ८०४, सोयाबीन ३४ हजार १७१, तर मूग पाच हजार ८०८ क्विंटलची आवक झाली होती. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटून आर्थिक नुकसान झाले होते. २०२० ते २०२१ या हंगामात मुरुम बाजार समितीत सर्वच शेतमालाची आवक मागील वर्षीच्या तुलनेत ५० हजार ८८ क्विंटलने वाढली असल्याचे दिसून आले. हरभरा २९ हजार ४१४, तूर ३९ हजार ४२०, सोयाबीन ४२ हजार २०२, उडीद २७ हजार ३५२, तर मूग ८ हजार ८३५ क्विंटलची आवक झाली. त्यामुळे कोरोनाच्या काळातही चांगली आवक होऊन बाजार समितीत ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

कोट........

यंदा कोरोनामुळे अनेक बाजार समित्या संकटात आहेत. मुरुम परिसरात कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरू झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, सोयाबीन, तूर, मूग याची खरेदी विक्री बाजारात वेळेवर झाली. शेतमालालाही यावर्षी चांगला दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीची उलाढाल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० कोटी ७१ लाखांनी वाढली आहे. आम्ही बाजार समितीकडून सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याने व पारदर्शक व्यवहार होत असल्याने बाजारात आवक वाढली आहे.

- बापूराव पाटील, मुरूम बाजार समिती