तालुक्यात संजय गांधी निराधारचे २ हजार ९१० लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे १ हजार २१७० व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतनाचे ५ हजार ८७० असे एकूण २० हजार ९५० लाभार्थी आहेत. मागील लॉकडाऊन काळात या निराधारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी देखील मदतीचे हात पुढे केल्याने या निराधारांची अडचण थोडी कमी झाली होती. दरम्यान, या लॉकडाऊन काळात सरकारने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिक्रिया @
राज्य सरकारने कोरोना काळात एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही चांगली बाब आहे. यामुळे कोरोना काळात निराधारांना अधार मिळणार आहे.
- नागरबाई राजेंद्र मेहर, लाभार्थी, भूम
मागील संपूर्ण वर्ष कोरोनामध्ये गेले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशावेळी राज्य सरकारने निराधारांना एक हजार रुपयांची मदत जाहीर केल्याने नक्कीच आधार मिळाला आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक ओढाताण होणार आहे.
- यमुना माधव गुरसाळी, लाभार्थी, भूम
निराधारांना सरकारने एक हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केल्याने कोरोना महामारीच्या काळात काही प्रमाणात दैनंदिन खर्चास याचा उपयोग होणार आहे. ही मदत तुटपुंजी असली तरी लॉकडाऊन काळात आर्थिक हातभार लागला आहे.
- शेख मुनेर शेखलाल, लाभार्थी भूम
कोरोना महामारीत निराधारांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत लॉकडाऊन काळात गरजेची होती. यामुळे निराधारांना नक्कीच आधार मिळाला आहे. यातून किमान निराधारांचा औषधोपचारासाठीचा खर्च तरी भागणार आहे.
- सिंकदर गफूर पठाण, लाभार्थी, भूम
निराधाराचे जे मानधन मिळते, त्यावरच सध्या माझी उपजीविका चालते. कोरोनाचा लॉकडाऊन पुन्हा सुरू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. आशा परिस्थितीत सरकारने निराधारांना आर्थिक मदत जाहीर करून मोठा आधार दिला आहे.
- रुक्मिणीबाई भाऊसाहेब बोराडे, लाभार्थी, सावरगाव