शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

करडईच्या पेऱ्यात २० टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST

उस्मानाबाद : यंदा खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे ...

उस्मानाबाद : यंदा खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे तेल पिकाची पेरणी म्हणावी तशी झालेली आहे. गतवर्षी करडीची ५ हजार ५३९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी करडीचा पेरा ४ हजार ७६१ हेक्टरवर झाला आहे. जवस व सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे.

कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. सर्वाधिक दर हे खाद्यतेलांचे वाढले होते. दिवाळी सणाच्या तोंडावर तेलाच्या किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या. दिवाळी सण झाल्यानंतर तेलाचे भाव उतरतील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती; मात्र दिवाळी होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला, तरी खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढच होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. तेलाचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र तेलपिकांच्या क्षेत्रात घट होत चालली आहे. गतर्षीच्या तुलनेत सोयाबीन, भूईमूग पीक वगळता करडी, जवस, सूर्यफूल, तीळ, कारळ तेलपिकाचे क्षेत्र घटले आहे. खरिपात पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनचे क्षेत्र ३५ हजार ८२६ हजार हेक्टरने वाढले आहे. भूईमुगाचा पेरा ७२८ हेक्टरने वाढला आहे. जवस २३३, करडीचे क्षेत्र ७७८ हेक्टरने घटले आहे.

चौकट...

जवस, कारळ होतेय हद्दपार

मागील दहा ते पंधरा वर्षांपूर्वी अनेक शेतकरी तेल व चटणीसाठी जवसाची लागवड करीत होते. कारळाचे क्षेत्र वाढले होते. या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत होते; मात्र त्यानंतर ऊस व इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. त्यामुळे जवस, कारळाचे क्षेत्र घटू लागले आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात रबी हंगामात ७९२ हेक्टर क्षेत्रावर जवसाची पेरणी झाली होती. यंदा ५५९ हेक्टर क्षेत्रावर जवसाचा पेरा झाला. कारळाची लागवड गतवर्षी ४९५ हेक्टर क्षेत्रावर झाली. यंदा कारळाची २५७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

कोट...

जिल्ह्यात तेलपीक पेरणी क्षेत्र वाढण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रबी हंगामात करडी, सूर्यफूल, जवस पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शेतकरी गटांना तेलघाना सुरू केले जात आहे. मुबलक पाणी असल्याने यंदा उन्हाळी भूईमूग पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे.

उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

रानडुकरांमुळे भूईमूग लागवड कमी झाली आहे. शिवाय, जिल्ह्यात तेल पिकांवर प्रक्रिया उद्योग नाहीत. बाजारात भावही म्हणावा तसा मिळत नाही. त्यामुळे क्षेत्र घटत चालले आहे. तेलपिके महत्त्वाची आहेत. शासनाने पिकांना भाव चांगला द्यावा.

रानडुकरांमुळे भूईमूग लागवड कमी झाली आहे. शिवाय, जिल्ह्यात तेल पिकांवर प्रक्रिया उद्योग नाहीत. बाजारात भावही म्हणावा तसा मिळत नाही. त्यामुळे जवस, कारळ, सूर्यफूल, करडीचे क्षेत्र घटत चालले आहे. तेलपिके महत्त्वाची आहेत. शासनाने तेलबियांना भाव चांगला द्यावा. यंदा दोन एकर क्षेत्रावर करडीची लागवड केली आहे. रानडुकरांचा करडी पिकास धोका नाही.

बिभिषण कदम, शेतकरी.