शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या १३० शाळांना लागणार कुलूप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST

सुरूवातीच्या काळात इंग्रजी शाळांचे प्रमाण शहरामध्येच अधिक हाेते. कालांतराने गावाेगावी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. पालकही अशा शाळांकडे आकर्षित ...

सुरूवातीच्या काळात इंग्रजी शाळांचे प्रमाण शहरामध्येच अधिक हाेते. कालांतराने गावाेगावी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. पालकही अशा शाळांकडे आकर्षित हाेत असल्याने त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर हाेऊ लागाला आहे. मध्यंतरी राज्य शासनाने २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायाेजन करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून तसा अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला हाेता. त्यानुसार जिल्ह्यात २० पेक्षा कमी पट असणार्या शाळांची संख्या १३० च्या घरात आहे. अशा शाळा समायाेजित करण्याच्या अनुषंगाने काही जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू झाली आहे. येणार्या शैक्षणिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्यातील तब्बल १३० शाळांना कायमचे टाळे लागणार आहेत. या शाळा दुसर्या शाळांमध्ये मर्ज करण्यात आल्यानंतर थाेडेथाेडके नव्हे तर तब्ब्ल अडीचशेवर शिक्षकांचा प्रश्न निर्माण हाेणार आहे. या अनुषंगाने एका आमदारांनी तारांकित प्रश्नही विचारला आहे.

अशी आहे आकडेवार

१००२

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या

००.००

पटसंख्येअभावी यापूर्वी बंद झालेल्या शाळज्ञ

१३०

२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा

एवढ्या शाळांचे हाेणार समायाेजन

२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायाेजन करण्याबाबत शासनाच्या वेळाेवेळी सूचना आल्या आहेत. त्यानुसार २० पेक्षा कमी पट असलेल्या १३० शाळा आहेत. यामध्ये भूम तालुक्यातील १४, कळंब १८, लाेहारा ०४, उमरगा १८, उस्मानाबाद २८, परंडा २१, तुळजापूर १९ आणि वाशी तालुक्यातील १० शाळांचा समावेश आहे.

शिक्षकांचे काय?

जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १३० शाळांचा पट वीस पेक्षा कमी आहे. या शाळांचे समायाेजन झाल्यानंतर थाेडेथाेडके नव्हे, तर अडीचशेवर शिक्षकांचा प्रश्न निर्माण हाेणार आहेत. अगाेदरच आपल्याकडे शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यात आणखी अडीचशेवर गुरूजींची भर पडल्यानंतर समायाेजनाचा प्रश्न अधिक गंभीर हाेऊ शकताे.

विद्यार्थ्यांचे काय?

वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळा नजीकच्या शाळांमध्ये समायाेजित केल्यानंतर विद्यार्थ्यांनाही गैरसाेयीचा सामना करवा लागू शकताे. कारण यातील काही गावे आडवळणी आहेत. तेथे जाण्यासाठी वाहनांची साेय नाही. सायकलीवरून जायचे म्हटले तर रस्तेही चांगले नाहीत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार आहे.

काेट...