शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सराईत सोनसाखळीचोर टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:47 IST

गुन्हे शाखेची कारवाई : २० लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी झारखंड व ओडिशाच्या सीमेवरून सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामधील २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारांचा मागोवा घेत असताना गुन्हे शाखा कक्ष २चे हवालदार सुनील साळुंखे यांना एका टोळीच्या म्होरक्याची माहिती मिळाली होती. तो रेल्वेने झारखंड येथून कोलकाता येथे पळ काढत होता. उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सहायक निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, प्रवीण फडतरे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने झारखंड पोलिसांच्या मदतीने धावत्या रेल्वेत झाडाझडती घेऊन तन्वीर शेखच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्याच्याकडून इतरही साथीदारांची माहिती  मिळाली  असता त्यांनाही अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली आहे.तन्वीर, मोहम्मद इब्राहिम शेख (२२), अखिल शरीफ रहमान शेख (२५), तशरुफ बेइदुर रहमान शेख (२२), शबनम शब्बीर शेख (२५) व हारून लाला सय्यद (२३) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात केलेल्या २० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली व सुमारे २० लाखांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीच्या अटकेने इतर टोळ्यांमध्ये कारवाईचा धाक तयार होऊन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.