शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:25 IST

खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देशेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून मागील दोन तीन दिवसांपासून पती-पत्नीत भांडण सुरू होते.

माजलगाव (जि. बीड ) : तालुक्यातील मोगरा या गावानजीक असलेल्या रामनगर तांडा येथे शेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.

रामनगर तांड्यावरील रहिवासी बंडू उत्तम जाधव (४) हा आपल्या कुटुंबासह शेतात कापूस वेचत होता. त्यावेळी अचानक बंडू जाधव याने त्याची पत्नी गंगा (३१) हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर तो तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या मुलगा करण (९) आणि मुलगी पूजा (११) यांच्याकडे गेला.मुलीला पैसे देऊन त्याने गावात जायला सांगितले. नंतर मुलाला घेऊन तो पत्नीला मारलेल्या ठिकाणी आला. तेथे बंडूने मुलाचा देखील गळा आवळून खून केला. त्यानंतर जवळील चाकूने त्या दोघांवर पोटात चाकूने वार करून स्वत:च्या पोटात आणि हातावर वार करून घेतले. तितक्यात आजूबाजूच्या शेतात काम करणारे घटनास्थळी धावले. स्वत:वर वार करून तडफडत असलेल्या बंडूने जीव जात नसल्याने जवळच असलेल्या रोहित्राकडे धाव घेतली. त्याचा जोरदार धक्का बसल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला.

एकच हल्लकल्लोळ माजल्यानंतर जमलेल्या लोकांनी बंडूला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रु ग्णालयात पाठवले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यास बीड येथील जिल्हा रु ग्णालयात त्यास रेफर करण्यात आले आहे. दरम्यान कापूस वेचत असताना नेमके काय घडले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठवले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. नातेवाईकांनी ग्रामीण रु ग्णालयात एकच गर्दी केली होती. 

...म्हणून मुलगी वाचलीशेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू व त्याची पत्नी गंगा यांच्यामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून भांडण सुरू होते. यातूनच हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा परिसरात होती. ९ वर्षांच्या निष्पाप करण जाधवचा यात काय दोष असे म्हणत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. पत्नीच्या हत्येनंतर मुलीला स्वत: बंडुने गावात पाठविल्याने तिचे प्राण वाचले.