शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:25 IST

खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देशेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून मागील दोन तीन दिवसांपासून पती-पत्नीत भांडण सुरू होते.

माजलगाव (जि. बीड ) : तालुक्यातील मोगरा या गावानजीक असलेल्या रामनगर तांडा येथे शेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.

रामनगर तांड्यावरील रहिवासी बंडू उत्तम जाधव (४) हा आपल्या कुटुंबासह शेतात कापूस वेचत होता. त्यावेळी अचानक बंडू जाधव याने त्याची पत्नी गंगा (३१) हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर तो तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या मुलगा करण (९) आणि मुलगी पूजा (११) यांच्याकडे गेला.मुलीला पैसे देऊन त्याने गावात जायला सांगितले. नंतर मुलाला घेऊन तो पत्नीला मारलेल्या ठिकाणी आला. तेथे बंडूने मुलाचा देखील गळा आवळून खून केला. त्यानंतर जवळील चाकूने त्या दोघांवर पोटात चाकूने वार करून स्वत:च्या पोटात आणि हातावर वार करून घेतले. तितक्यात आजूबाजूच्या शेतात काम करणारे घटनास्थळी धावले. स्वत:वर वार करून तडफडत असलेल्या बंडूने जीव जात नसल्याने जवळच असलेल्या रोहित्राकडे धाव घेतली. त्याचा जोरदार धक्का बसल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला.

एकच हल्लकल्लोळ माजल्यानंतर जमलेल्या लोकांनी बंडूला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रु ग्णालयात पाठवले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यास बीड येथील जिल्हा रु ग्णालयात त्यास रेफर करण्यात आले आहे. दरम्यान कापूस वेचत असताना नेमके काय घडले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठवले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. नातेवाईकांनी ग्रामीण रु ग्णालयात एकच गर्दी केली होती. 

...म्हणून मुलगी वाचलीशेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू व त्याची पत्नी गंगा यांच्यामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून भांडण सुरू होते. यातूनच हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा परिसरात होती. ९ वर्षांच्या निष्पाप करण जाधवचा यात काय दोष असे म्हणत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. पत्नीच्या हत्येनंतर मुलीला स्वत: बंडुने गावात पाठविल्याने तिचे प्राण वाचले.