शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:25 IST

खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देशेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून मागील दोन तीन दिवसांपासून पती-पत्नीत भांडण सुरू होते.

माजलगाव (जि. बीड ) : तालुक्यातील मोगरा या गावानजीक असलेल्या रामनगर तांडा येथे शेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.

रामनगर तांड्यावरील रहिवासी बंडू उत्तम जाधव (४) हा आपल्या कुटुंबासह शेतात कापूस वेचत होता. त्यावेळी अचानक बंडू जाधव याने त्याची पत्नी गंगा (३१) हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर तो तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या मुलगा करण (९) आणि मुलगी पूजा (११) यांच्याकडे गेला.मुलीला पैसे देऊन त्याने गावात जायला सांगितले. नंतर मुलाला घेऊन तो पत्नीला मारलेल्या ठिकाणी आला. तेथे बंडूने मुलाचा देखील गळा आवळून खून केला. त्यानंतर जवळील चाकूने त्या दोघांवर पोटात चाकूने वार करून स्वत:च्या पोटात आणि हातावर वार करून घेतले. तितक्यात आजूबाजूच्या शेतात काम करणारे घटनास्थळी धावले. स्वत:वर वार करून तडफडत असलेल्या बंडूने जीव जात नसल्याने जवळच असलेल्या रोहित्राकडे धाव घेतली. त्याचा जोरदार धक्का बसल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला.

एकच हल्लकल्लोळ माजल्यानंतर जमलेल्या लोकांनी बंडूला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रु ग्णालयात पाठवले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यास बीड येथील जिल्हा रु ग्णालयात त्यास रेफर करण्यात आले आहे. दरम्यान कापूस वेचत असताना नेमके काय घडले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठवले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. नातेवाईकांनी ग्रामीण रु ग्णालयात एकच गर्दी केली होती. 

...म्हणून मुलगी वाचलीशेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू व त्याची पत्नी गंगा यांच्यामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून भांडण सुरू होते. यातूनच हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा परिसरात होती. ९ वर्षांच्या निष्पाप करण जाधवचा यात काय दोष असे म्हणत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. पत्नीच्या हत्येनंतर मुलीला स्वत: बंडुने गावात पाठविल्याने तिचे प्राण वाचले.