शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:25 IST

खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देशेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून मागील दोन तीन दिवसांपासून पती-पत्नीत भांडण सुरू होते.

माजलगाव (जि. बीड ) : तालुक्यातील मोगरा या गावानजीक असलेल्या रामनगर तांडा येथे शेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.

रामनगर तांड्यावरील रहिवासी बंडू उत्तम जाधव (४) हा आपल्या कुटुंबासह शेतात कापूस वेचत होता. त्यावेळी अचानक बंडू जाधव याने त्याची पत्नी गंगा (३१) हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर तो तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या मुलगा करण (९) आणि मुलगी पूजा (११) यांच्याकडे गेला.मुलीला पैसे देऊन त्याने गावात जायला सांगितले. नंतर मुलाला घेऊन तो पत्नीला मारलेल्या ठिकाणी आला. तेथे बंडूने मुलाचा देखील गळा आवळून खून केला. त्यानंतर जवळील चाकूने त्या दोघांवर पोटात चाकूने वार करून स्वत:च्या पोटात आणि हातावर वार करून घेतले. तितक्यात आजूबाजूच्या शेतात काम करणारे घटनास्थळी धावले. स्वत:वर वार करून तडफडत असलेल्या बंडूने जीव जात नसल्याने जवळच असलेल्या रोहित्राकडे धाव घेतली. त्याचा जोरदार धक्का बसल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला.

एकच हल्लकल्लोळ माजल्यानंतर जमलेल्या लोकांनी बंडूला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रु ग्णालयात पाठवले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यास बीड येथील जिल्हा रु ग्णालयात त्यास रेफर करण्यात आले आहे. दरम्यान कापूस वेचत असताना नेमके काय घडले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठवले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. नातेवाईकांनी ग्रामीण रु ग्णालयात एकच गर्दी केली होती. 

...म्हणून मुलगी वाचलीशेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू व त्याची पत्नी गंगा यांच्यामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून भांडण सुरू होते. यातूनच हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा परिसरात होती. ९ वर्षांच्या निष्पाप करण जाधवचा यात काय दोष असे म्हणत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. पत्नीच्या हत्येनंतर मुलीला स्वत: बंडुने गावात पाठविल्याने तिचे प्राण वाचले.