शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

एकमेकाप्रती सहकार्याची भावना ठेवा- श्री गौरवकृष्णजी

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़

नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़
कौठा परिसरात श्री सालासर भजन मंडळ सेवा समितीच्यावतीने आयोजित श्रीरामकथेच्या सहाव्या दिवशीच्या सत्संगात व्यास हे भाविकांना उपदेश करीत होते़ प्रारंभी वेदघोष, मंत्रोच्चार करण्यात आले़ त्यानंतर गुरूवर्यांचे पुजन करण्यात आले़
शुक्रवारच्या सत्संगात त्यांनी कुटूंबातील आपला सहभाग, भोग आणि त्याग यासंबंधी श्रीराम चरित्राच्या आधारे स्पष्ट केला़ ते म्हणाले, सध्या सर्वचजण पैसा आणि व्यवसायाच्या मागे लागला आहे़ कुणालाही गरजेपुरत्या पैशापेक्षा अधिक पैसा हवा असून जो-तो आपल्या पिढीसोबत पुढील पिढीचा नको तितका विचार करतो आहे, आपल्या पुढच्या पिढीला देखील अर्थाजनासाठी हात-पाय, बुद्धी असल्याचा जसा काय विसरच पडला आहे़ व्यवसाय आणि अर्थार्जन करताना व्यक्तीमध्ये एकमेकांबाबत घृणा निर्माण झाली आहे़ एकमेकांना मागे ओढण्याची जशी काय स्पर्धाच लागली आहे़ ते समाजाच्या विकासासाठी घातक असल्याचेही त्यांनी सांगितले़
आपल्या कौटुंबिक जीवनात कुण्याही महिलेला अथवा पुरूषाला कुटूंबाची जबाबदारी मुलांवर सोपविण्याची इच्छा दिसत नाही़ खरे तर आपले अपत्य कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यास सक्षम झाल्यास वयाच्या पन्नाशीनंतर आपण स्वत:हून आपल्या कमरेच्या चाव्या त्यांच्या हाती दिल्या पाहीजे़ परंतू असे होतांना दिसत नाही़ श्रीरामांना राजा दशरथाने योग्यवेळी राज्यभिषेक करून समस्त आयोध्येच्या कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती़ ही सत्यता नाकारून चालणार नाही, असेही व्यास यांनी सांगितले़
सचसे मुह मोडने से क्या होगा,
ये जहा छोडने से क्या होगा
अपने मुंह की धूल साफ करो,
आयना तोडणे से क्या होगा़़़ यावेळी त्यांनी जीवनातील मोक्षाबाबतही भाष्य केले़ ते म्हणाले, जीवनातील भगवंत प्राप्तीची इच्छा पुर्ण न होताच शरीर सोडल्यास तो आपला मृत्यू असतो तर इच्छापुर्तीनंतर शरीर सोडल्यास तो मोक्ष असतो़ त्यासाठी आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहीजे़