शहरं
Join us  
Trending Stories
1
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
2
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
3
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
4
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
5
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
6
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
7
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
8
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
9
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
10
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
11
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
12
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
13
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
14
बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
15
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद
16
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
17
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
19
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
20
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन

एकमेकाप्रती सहकार्याची भावना ठेवा- श्री गौरवकृष्णजी

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़

नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़
कौठा परिसरात श्री सालासर भजन मंडळ सेवा समितीच्यावतीने आयोजित श्रीरामकथेच्या सहाव्या दिवशीच्या सत्संगात व्यास हे भाविकांना उपदेश करीत होते़ प्रारंभी वेदघोष, मंत्रोच्चार करण्यात आले़ त्यानंतर गुरूवर्यांचे पुजन करण्यात आले़
शुक्रवारच्या सत्संगात त्यांनी कुटूंबातील आपला सहभाग, भोग आणि त्याग यासंबंधी श्रीराम चरित्राच्या आधारे स्पष्ट केला़ ते म्हणाले, सध्या सर्वचजण पैसा आणि व्यवसायाच्या मागे लागला आहे़ कुणालाही गरजेपुरत्या पैशापेक्षा अधिक पैसा हवा असून जो-तो आपल्या पिढीसोबत पुढील पिढीचा नको तितका विचार करतो आहे, आपल्या पुढच्या पिढीला देखील अर्थाजनासाठी हात-पाय, बुद्धी असल्याचा जसा काय विसरच पडला आहे़ व्यवसाय आणि अर्थार्जन करताना व्यक्तीमध्ये एकमेकांबाबत घृणा निर्माण झाली आहे़ एकमेकांना मागे ओढण्याची जशी काय स्पर्धाच लागली आहे़ ते समाजाच्या विकासासाठी घातक असल्याचेही त्यांनी सांगितले़
आपल्या कौटुंबिक जीवनात कुण्याही महिलेला अथवा पुरूषाला कुटूंबाची जबाबदारी मुलांवर सोपविण्याची इच्छा दिसत नाही़ खरे तर आपले अपत्य कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यास सक्षम झाल्यास वयाच्या पन्नाशीनंतर आपण स्वत:हून आपल्या कमरेच्या चाव्या त्यांच्या हाती दिल्या पाहीजे़ परंतू असे होतांना दिसत नाही़ श्रीरामांना राजा दशरथाने योग्यवेळी राज्यभिषेक करून समस्त आयोध्येच्या कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती़ ही सत्यता नाकारून चालणार नाही, असेही व्यास यांनी सांगितले़
सचसे मुह मोडने से क्या होगा,
ये जहा छोडने से क्या होगा
अपने मुंह की धूल साफ करो,
आयना तोडणे से क्या होगा़़़ यावेळी त्यांनी जीवनातील मोक्षाबाबतही भाष्य केले़ ते म्हणाले, जीवनातील भगवंत प्राप्तीची इच्छा पुर्ण न होताच शरीर सोडल्यास तो आपला मृत्यू असतो तर इच्छापुर्तीनंतर शरीर सोडल्यास तो मोक्ष असतो़ त्यासाठी आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहीजे़