शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

बारावीची परीक्षा संपली आता सीईटीची तयारी सुटका : पुढील नियोजन सुरू

By admin | Updated: March 10, 2016 00:26 IST

जळगाव : बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून संपली असलीतरी विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेची तयारीचे नियोजन विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची घरपोहोच पुस्तक योजना अयशस्वी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या पेठे हायस्कूल केंद्रातील विद्यार्थी समंत्रकांची सत्रेच न झाल्याने त्रस्त असून आता शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाकडे याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतली गेल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विभागाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये पूर्वतयारी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी विविध ठिकाणी केंद्रे देण्यात आली आहेत. परंतु या केंद्रांवरील कारभार आता विद्यापीठाच्याच हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. पेठे हायस्कूलमधील केंद्रदेखील त्याला अपवाद ठरले नाही. या केंद्रावर गोंधळाचे वातावरण असून अनेक वर्षे संमत्रकांची संपर्कसत्रेच होत नाही. वारंवार तक्रार करून विद्यार्थ्यांना दाद दिली जात नाही. तरीही पुस्तके आणि स्वयंअध्ययनावरून विद्यार्थी कसातरी अभ्यास करतात, तर काहींना एटीकेटी दिली जात असल्याने त्याच पद्धतीने ढकलगाडी पुढे नेली जाते. यंदा मात्र विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर म्हणजे विद्यापीठाने घरपोहोच पुस्तके देण्याची योजना राबविली आणि पुस्तकांची किंमतही विद्यार्थ्यांकडून घेतली परंतु ही योजना अयशस्वी ठरली. विद्यापीठाने आपले अपयश लपविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चुकीचे पत्ते दिले असा ठपका ठेवला असून आता पुस्तके हवी असल्यास पुन्हा विकत घेण्यास सांगत आहे. हा एक भाग परंतु दुसरीकडे पेठे हायस्कूलमध्ये आधीच समंत्रकांची संपर्कसत्रे होत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
वास्तविक, अभ्यासकेंद्राकडे कोणते पात्र संमत्रक म्हणजे शिक्षक किंवा अनुभवी व्यक्ती आहेत, त्याची यादी पडताळून आणि मान्यता देऊन मगच विद्यापीठ केंद्राला नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता देत असते. त्यानंतर समंत्रकांची संपर्कसत्रे झाल्याचा विद्यार्थ्यांच्या स‘ांच्या उपस्थितीपत्रकाच्या आधारे त्यांचे मानधनही दिले जाते. असे असताना वर्षभरात एकही संपर्कसत्र झाले नसल्यास विद्यापीठाने त्याची काय दखल घेतली हा प्रश्न आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केंद्रसंयोजकांशी वारंवार संपर्क साधून दखल न घेतल्याने अखेरीस त्यांनी विद्यापीठात जाऊन कुलगुरूंना निवेदन दिले परंतु त्याचीही अद्याप दखल न घेतली गेल्याचे बंद असलेल्या संपर्कसत्रावरून दिसून येत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या भीतीने चिंताक्रांत आहेत.
जोड आहे.