शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे. सुमारे ६० टक्के शाळांमध्ये दोनशेपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. विशेष म्हणजे, पटसंख्या वाढावी या उद्देशाने १४ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु, सदरील मात्राही निरर्थक ठरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असतानाही ना लोकप्रतिनिधी, ना शिक्षण विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत आहेत.एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ५३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. यातील बहुतांशी शाळा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. असे असतानाही विद्यार्थी संख्येची घसरण सुरूच आहे. ही घसरण थांबविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच आज ५३ पैकी ३५ शाळा अशा आहेत, की जेथे विद्यार्थीसंख्या दोनशेपेक्षाही कमी आहे. तर उर्वरित १८ शाळांत मात्र, दोनशेवर विद्यार्थी आहेत. उपरोक्त आकडेवारी पाहता, जवळपास ६० टक्क्यांवर शाळा सलाईनवर असल्याचे समोर येते. या शाळांची अवस्था सुधारण्यासाठी फारशे प्रयत्न होत नसल्यानेच वर्षागणिक पटसंख्या घटू लागली आहे. पटसंख्येची घसरगुंडी थांबविण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने माध्यमिक शाळांतून व्यवसाय शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत ५३ पैकी जवळपास १४ शाळांची निवड झाली आहे. परंतु, या उपक्रमाबाबात जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे व्यवसाय शिक्षण सुरू करूनही पटसंख्या अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. शिक्षण विभागाचा हा सर्व गोंधळी कारभार सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावले. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांतून व्यक्त होत आहे.पटसंख्या वाढणार कधी?जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ शिक्षक आहेत. सर्व सोयीसुविधाही आहेत. व्यवसाय शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. असे असतानाही पटसंख्या काही केल्या वाढत नाही. त्याला कारणही तसेच आहे. पटसंख्या का कमी होतेय? याचा विचार करायला कोणीही राजी नाही. कधी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांच्या बैठकाही होत नाहीत. त्यामुळे पटसंख्या वाढणार तरी कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.