शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे. सुमारे ६० टक्के शाळांमध्ये दोनशेपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. विशेष म्हणजे, पटसंख्या वाढावी या उद्देशाने १४ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु, सदरील मात्राही निरर्थक ठरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असतानाही ना लोकप्रतिनिधी, ना शिक्षण विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत आहेत.एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ५३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. यातील बहुतांशी शाळा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. असे असतानाही विद्यार्थी संख्येची घसरण सुरूच आहे. ही घसरण थांबविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच आज ५३ पैकी ३५ शाळा अशा आहेत, की जेथे विद्यार्थीसंख्या दोनशेपेक्षाही कमी आहे. तर उर्वरित १८ शाळांत मात्र, दोनशेवर विद्यार्थी आहेत. उपरोक्त आकडेवारी पाहता, जवळपास ६० टक्क्यांवर शाळा सलाईनवर असल्याचे समोर येते. या शाळांची अवस्था सुधारण्यासाठी फारशे प्रयत्न होत नसल्यानेच वर्षागणिक पटसंख्या घटू लागली आहे. पटसंख्येची घसरगुंडी थांबविण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने माध्यमिक शाळांतून व्यवसाय शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत ५३ पैकी जवळपास १४ शाळांची निवड झाली आहे. परंतु, या उपक्रमाबाबात जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे व्यवसाय शिक्षण सुरू करूनही पटसंख्या अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. शिक्षण विभागाचा हा सर्व गोंधळी कारभार सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावले. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांतून व्यक्त होत आहे.पटसंख्या वाढणार कधी?जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ शिक्षक आहेत. सर्व सोयीसुविधाही आहेत. व्यवसाय शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. असे असतानाही पटसंख्या काही केल्या वाढत नाही. त्याला कारणही तसेच आहे. पटसंख्या का कमी होतेय? याचा विचार करायला कोणीही राजी नाही. कधी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांच्या बैठकाही होत नाहीत. त्यामुळे पटसंख्या वाढणार तरी कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.