शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे. सुमारे ६० टक्के शाळांमध्ये दोनशेपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. विशेष म्हणजे, पटसंख्या वाढावी या उद्देशाने १४ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु, सदरील मात्राही निरर्थक ठरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असतानाही ना लोकप्रतिनिधी, ना शिक्षण विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत आहेत.एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ५३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. यातील बहुतांशी शाळा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. असे असतानाही विद्यार्थी संख्येची घसरण सुरूच आहे. ही घसरण थांबविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच आज ५३ पैकी ३५ शाळा अशा आहेत, की जेथे विद्यार्थीसंख्या दोनशेपेक्षाही कमी आहे. तर उर्वरित १८ शाळांत मात्र, दोनशेवर विद्यार्थी आहेत. उपरोक्त आकडेवारी पाहता, जवळपास ६० टक्क्यांवर शाळा सलाईनवर असल्याचे समोर येते. या शाळांची अवस्था सुधारण्यासाठी फारशे प्रयत्न होत नसल्यानेच वर्षागणिक पटसंख्या घटू लागली आहे. पटसंख्येची घसरगुंडी थांबविण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने माध्यमिक शाळांतून व्यवसाय शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत ५३ पैकी जवळपास १४ शाळांची निवड झाली आहे. परंतु, या उपक्रमाबाबात जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे व्यवसाय शिक्षण सुरू करूनही पटसंख्या अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. शिक्षण विभागाचा हा सर्व गोंधळी कारभार सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावले. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांतून व्यक्त होत आहे.पटसंख्या वाढणार कधी?जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ शिक्षक आहेत. सर्व सोयीसुविधाही आहेत. व्यवसाय शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. असे असतानाही पटसंख्या काही केल्या वाढत नाही. त्याला कारणही तसेच आहे. पटसंख्या का कमी होतेय? याचा विचार करायला कोणीही राजी नाही. कधी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांच्या बैठकाही होत नाहीत. त्यामुळे पटसंख्या वाढणार तरी कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.