शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘झेडपी’चा मार्चएन्ड संपता संपेना !

By admin | Updated: April 17, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : मार्चअखेर आर्थिक व्यवहार बंद करावेत, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या बाबतीत विचार केल्यास

उस्मानाबाद : मार्चअखेर आर्थिक व्यवहार बंद करावेत, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या बाबतीत विचार केल्यास संबंधित निर्देश कागदावरतीच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिना अर्धाअधिक सरलेला असतानाही आर्थिक व्यवहार बंद (क्लोज) करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून त्यांच्यावर उसनवारीची वेळ आली आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या विविध विभागांना विकास कामे राबविण्यासाठी कोट्यवधीचा निधी येतो. त्याचप्रमाणे स्वउत्पन्नाचाही समावेश असतो. हा सर्व निधी त्या-त्या आर्थिक वर्षामध्ये खर्च करणे बंधनकारक असते. परंतु, जिल्हा परिषदेने मार्च महिना सरून जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी, जुन्या वर्षातील आर्थिक व्यवहार बंद केलेले नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काही विभागांचे तर फेब्रुवारी महिन्याचेही वेतन करण्यात आलेले नाही. संबंधित विभागांसाठी बजेट उपलब्ध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा मार्चएन्ड होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.का होतोय विलंब ?शासनाकडून काही योजनांचा निधी वर्षअखेर येतो. हा निधी लॅप्स होवू नये, हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी उशिराला आलेला निधी पुढच्या वर्षात खर्च करता असतानाही मार्चएन्डला विलंब का केला जातोय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.व्हॉट्सअ‍ॅपवरही ‘पोस्ट’जि.प.च्या काही कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी, मार्च तर काहींचे मार्च महिन्याच वेतन झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांतूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशी पोस्टही व्हॉट्सअ‍ॅपर फिरू लागली आहे. ‘देवा दोन महिने झाले तरी अजून पगार नाही’, ही पोस्ट अनेक गुरूजींच्या मोबाईलवर दिसून येत आहे. (प्रतिनिधी)‘मार्चएन्ड’बाबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उबाळे यांच्याकडे विचारणा केली असता गुरूवारी आर्थिक व्यवहार पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्याकडे विचारना केली असता ‘मार्चएन्ड’ करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनासाठी झालेल्या विलंबाबत विचारले असता, काही विभागांकडे बजेट नसल्याचे नमूद करण्यात आले. मार्चएन्ड बाबत दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्याने नेमके खरे कोणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे.