शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

सभेवरून रंगले जिल्हा परिषदेचे राजकारण

By admin | Updated: August 14, 2014 01:55 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेची विशेष सभा १९ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेवरूनच सत्ताधारी आणि विरोधी मंडळींमधील राजकारण रंगू लागले असून

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेची विशेष सभा १९ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेवरूनच सत्ताधारी आणि विरोधी मंडळींमधील राजकारण रंगू लागले असून सभा विशेष की सर्वसाधारण यावरून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. या राजकारणात प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच करमणूक होत आहे.३१ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभा विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे चर्चेविनाच संपली. २७ मे रोजी झालेल्या सभेतील पाणीटंचाईच्या चर्चेचे अनुपालन या सभेत का नाही, असे म्हणत तेव्हा विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी, हाच विरोधकांचा सूर होता. त्यासाठी काहींनी तर फर्निचरची मोडतोडही केली. प्रोसेडिंग बुक पळविण्याचा प्रयत्न झाला. तर सत्ताधारी मंडळींनीही ‘सर्व विषय मंजूर...मंजूर’ अशी जोरजोराने घोषणाबाजी करत सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर या मंडळींनी पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप केले. सभेच्या विषयपत्रिकेतील आयत्या वेळच्या विषयांसह एकूण ३० विषय मंजूर झाल्याचा दावा सत्ताधारी मंडळींनी केला. तर सभेत कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही व सभा सुरू ठेवण्यासाठी आम्ही मतदानाची मागणी करून देखील ती पूर्ण झाली नाही, असे सांगत ही सभा तहकूब झाली, असा दावा विरोधी सदस्यांनी केला. सर्वसाधारण सभेचा समारोप ‘वंदे मातरम्’ गिताने होतो, मात्र हे गीत सादर न झाल्याने सभा झालीच नाही, अशी पुष्टीही विरोधकांनी जोडली. या पार्श्वभूमीवर स्वत: अध्यक्षांनी १९ आॅगस्ट रोजी विशेष सभा होणार असल्याचे सर्व पदाधिकारी, सदस्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यासाठीची पूर्वसूचना सभेच्या १० दिवसांअगोदर सर्वांना पाठविण्यात आली आहे. मात्र या सभेत ३१ जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेतीलच सर्व विषय चर्चेसाठी ठेवण्यात आल्याने ही तहकूब झालेली सभा आहे की, विशेष सभा असा संभ्रम प्रशासनातीलच काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.कारण सत्ताधारींच्या दाव्यानुसार सभेतील विषय जर पूर्वीच मंजूर झालेले असतील तर केवळ चर्चा करण्यासाठी विरोधक तयारी दाखवितील का, आणि विरोधकांच्या दाव्यानुसार ३१ जुलै रोजीची सभा तहकूब झाल्यानेच आता पुन्हा सभा बोलावून त्यास विशेष सभा असे नाव दिले गेले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच्या या दावे-प्रतिदाव्यांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची रंगीत तालिम सुरू झाल्याची चर्चाही जिल्हा परिषदेच्या आवारात होत आहे.