शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

मित्र उपक्रमाला जिल्हा परिषदेचा खो

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

विठ्ठल फुलारी, भोकर आनापान साधनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढविणारा 'मित्र उपक्रम' राबविण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या

विठ्ठल फुलारी, भोकरआनापान साधनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढविणारा 'मित्र उपक्रम' राबविण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली नांदेड जिल्हा परिषदेत होत आहे़ आजच्या संगणक युगात बालके शिक्षण वा या ना त्या कारणाने आजी-आजोबापासून दूर गेले, तर आई-वडिलांना आपल्याच मुलांना नीतिमत्तेचे धडे देण्यास वेळ अपुरा पडतो़ यामुळे अनेक विद्यार्थी संस्कारापासून दूर जात असल्याची आजची स्थिती आहे़ शालेय जीवनात विद्यार्थ्यांना ताणतणाव भासू नये व तो वाईट गोष्टीकडे जावू नये म्हणून आनापान साधनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढविणारा मित्र उपक्रम सुरू करण्याचे परिपत्रक राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी ५ आॅक्टोबर २०११ रोजी काढले़ यानंतर अनेकवेळा शिक्षण विभागाने सूचना दिल्या़, परंतु त्याकडे नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले़आनापान साधना पद्धती म्हणजे विपश्यना शिकण्याची पहिली पायरी आहे़ आनापान साधनेच्या दैनंदिन सरावामुळे विद्यार्थी वाईट गोष्टींपासून, खोटे बोलण्यापासून दूर राहतात़ मनावर नियंत्रण ठेवण्यासही यशस्वी होतात़ यातूनच विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढते़ हे सर्व मित्र उपक्रमातून साध्य होवू शकते़ सदरील उपक्रम राबविण्यासाठी शाळा, गाव, तालुका व जिल्हा येथे समित्या गठीत करणे गरजेचे आहे़ यासोबतच दहा दिवस विपश्यना अभ्यास पूर्ण केलेल्या शिक्षकांची व तीन विपश्यना पूर्ण केलेल्या साधकाची नियुक्ती करून शिक्षकांचे शिबिरे व प्रशिक्षणाचे नियोजन करून या मित्र उपक्रमाला सुरुवात करणे आवयक होते़शासनाने परिपत्रक काढून व वेळोवेळी सूचना देवूनसुद्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षांत हा उपक्रम राबविण्यास नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग कमालीचा उदासीन दिसत आहे़ येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तरी हा उपक्रम राबेल का, असा प्रश्न पालकांना पडतो आहे़ (वार्ताहर)