शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जाचास वैतागून घेतले जाळून

By admin | Updated: May 21, 2014 00:15 IST

लातूर : सासरच्या जाचास कंटाळून जिल्ह्यातील दोन विवाहितांनी स्वत:ला जाळून घेतले आहे.

 लातूर : सासरच्या जाचास कंटाळून जिल्ह्यातील दोन विवाहितांनी स्वत:ला जाळून घेतले आहे. यातील एका विवाहितेचा मृत्यू झाला, तर दुसरीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अहमदपूर व किल्लारी पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. टेंभुर्णी येथील विवाहिता सुमित्रा रवि कासले यांंना आरोपी रवि कासले व अन्य दोघांनी व्यापारासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावला होता. या पैशासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या जाचास कंटाळून रविवारी सुमित्रा कासले यांनी स्वत:ला अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत पूर्णपणे जळाल्याने सुमित्रा यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार किसन तिपण्णा मंजनर यांनी अहमदपूर पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार आरोपी रवि कासले व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, जाऊवाडी येथील रुक्मिणबाई वाल्मिक घोलप (वय ३०) यांना लग्न झाल्यापासून सासरी किरकोळ कारणावरून जाच करण्यात येत होता. पती वाल्मिक प्रभू घोलप याच्यासह घरातील अन्य तीन सदस्य लहान-मोठ्या कारणावरून रुक्मिणबाई यांना अपशब्द वापरून अपमानित करीत होते. या जाचास कंंटाळून रुक्मिणबाई यांनी १५ मे रोजी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. या घटनेत त्या ३८ टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किल्लारी पोलिसांनी आरोपी वाल्मिक घोलप व अन्य तिघांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. जळाल्याने दोघींचा मृत्यू... निलंगा तालुक्यातील दगडवाडी येथील सोनाली विलास भोसले (वय २०) ही ९८ टक्के जळाली होती. तिला १२ मे रोजी उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, निलंगा तालुक्यातील केळगाव येथील सोजरबाई सुरेश राठोड (वय ३५) या स्वयंपाकासाठी स्टोव्ह पेटवीत असताना भडका उडाला. त्यात सोजरबाई ६९ टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर लातुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी निलंगा पोलिसांत नोंद आहे.