शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

परळी तालुक्यात तलाठ्यांची तेरा पदे रिक्त

By admin | Updated: August 10, 2014 02:22 IST

परळी: शेतकऱ्यांची विविध कामे तलाठ्याकडे असतात. मात्र परळी तालुक्यात आजही अनेक पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहे.

परळी: शेतकऱ्यांची विविध कामे तलाठ्याकडे असतात. मात्र परळी तालुक्यात आजही अनेक पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.परळी तालुक्यात १०६ गावे असून २९ तलाठी सज्जे आहेत. यापैकी केवळ १६ सज्जावरच तलाठी नियुक्त केलेले आहेत. बाकी १३ पदे रिक्त असल्याने या १६ तलाठ्यांवरच अतिरिक्त कारभार सोपविला जात आहे. मागील महिनाभरापासून पीक विम्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची झुंबड उडत होती. मात्र तलाठी पदे रिक्त असल्याने व उपस्थित तलाठ्यांवर अतिरिक्त कारभार सोपविल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत होती. एकाच दिवसात होणाऱ्या कामासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना तीन ते चार वेळेस चकरा माराव्या लागत होत्या. विशेष म्हणजे जी तलाठी कार्यालये आहेत अशा कार्यालयांसाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्याने अनेक कामे खोळंबत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उपलब्ध असलेले तलाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात होता. ही पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असून याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कारभार सोपविल्यामुळे ताण येत आहे. कामाचा जादा ताण येत असल्यामुळे तलाठ्यांची मानसिक स्थिती योग्य राहत नसल्याचे दिसून येत आहे. १०६ गावांसाठी केवळ १६ तलाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापासून पदे रिक्त असली तरी ते भरण्यासाठी वरिष्ठांना कुठलेही गांभिर्य नसल्याचे आरोप केला जात आहे. २९ तलाठी सज्जाचा कारभार १६ तलाठ्यांवर असल्याने एका तलाठ्यावर ९ गावांचा कामाचा ताण येत आहे. वाघाळ्याचे तलाठी विठ्ठल पंडित यांच्याकडे वाघाळा व नंदागौळ अशा दोन तलाठी सज्जांचा कारभार आहे. या दोन तलाठी सज्जांतर्गत सात गावांचा समावेश आहे. अशीच परिस्थिती बेलंब्याचे तलाठी सतीश भुसेवाड यांच्या बाबतीत आहे. बेलंबा व दैनापूर या दोन तलाठ्यांचा कारभार त्यांच्याकडे आहे. तलाठ्यांची संख्या कमी असल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत परळीच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर म्हणाल्या, ही पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे आम्ही मागणी केलेली आहे. या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावाही केला जात आहे. आठ बाय आठ च्या खोलीतच चालतो पंधरा गावांचा कारभारनंदागौळ व बेलंबा या दोन तलाठी सज्जांचे कार्यालय केवळ आठ बाय आठच्या खोलीत आहेत. तलाठी कार्यालयासाठी कमी जागा असल्याने तलाठ्यांना काम करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही ताटकळत उभे रहावे लागत आहेत. मागील महिन्यात पीक विम्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. हे तलाठी उशिरा सज्जावर येत असल्याने काही शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला होता. अनेक वेळा मागणी करूनही ही पदे अद्यापही भरलेली नाहीत. (वार्ताहर)