शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

होय, शहराला एक दिवसाआड पाणी पुरविता येणे शक्य: जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:02 IST

यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती ...

यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती औरंगाबादकरांमध्ये आहे, हे ओळखून महापालिका पाणी पुरवठ्याच्या नियोजनात काही करताना दिसत नाही. हे आश्चर्यकारक होय, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून नागरे यांनी म्हटले की, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी औरंगाबादकरांची वर्षानुवर्षांची अवस्था आहे. हे शहर स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट असल्यामुळे पाण्यासारखी अत्यावश्यक गरज समाधानकारकरितीने पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली तर ती चुकीची ठरू नये.

पुणे हे शहर गरजेपेक्षा दीडपट पाणी वापरणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील महापालिकेने व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हे शक्य करून दाखवले आहे. दुसरीकडे औरंगाबादजवळच जायकवाडी धरण असतानाही औरंगाबादकरांना ३६५ दिवसातून फक्त ५५ ते ६० दिवस पाणी मिळते व दुसरीकडे ४०५० रुपये पाणीपट्टी मात्र सक्तीने वसूल केली जाते.

औरंगाबाद शहराला जायकवाडीतून प्रतिदिनी १२० दशलक्ष लीटर पाणी मिळते. औरंगाबादची लोकसंख्या १६ लाख आहे. प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी प्रतिदिन घरगुती वापरासाठी मिळणे आवश्यक आहे. म्हणजे शहराची गरज २१६ दशलक्ष लीटर इतकी आहे. एक दिवसाआड पाणी देण्याचे मान्य केले तर महापालिकेला प्रतिदिन १०८ एमएलडी पाणी लागेल. म्हणजे पहिल्या दिवशी अर्धी लोकसंख्या असलेल्या भागात मनपा ११० एमएलडी साठ्यातून १०८ एमएलडी पाणी सहज पुरवू शकेल. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला दुसऱ्या दिवशी १०८ एमएलडी पाणी पुरविता येऊ शकेल. महापालिकेला एक दिवसआड पाणी पुरवणे अशक्य नाही. मात्र, यासाठी महापालिकेने जलकुंभाचे नियोजन करण्यावर भर देण्याची आवश्यकता नागरे यांनी व्यक्त केली आहे.