शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

होय, शहराला एक दिवसाआड पाणी पुरविता येणे शक्य: जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:02 IST

यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती ...

यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती औरंगाबादकरांमध्ये आहे, हे ओळखून महापालिका पाणी पुरवठ्याच्या नियोजनात काही करताना दिसत नाही. हे आश्चर्यकारक होय, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून नागरे यांनी म्हटले की, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी औरंगाबादकरांची वर्षानुवर्षांची अवस्था आहे. हे शहर स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट असल्यामुळे पाण्यासारखी अत्यावश्यक गरज समाधानकारकरितीने पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली तर ती चुकीची ठरू नये.

पुणे हे शहर गरजेपेक्षा दीडपट पाणी वापरणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील महापालिकेने व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हे शक्य करून दाखवले आहे. दुसरीकडे औरंगाबादजवळच जायकवाडी धरण असतानाही औरंगाबादकरांना ३६५ दिवसातून फक्त ५५ ते ६० दिवस पाणी मिळते व दुसरीकडे ४०५० रुपये पाणीपट्टी मात्र सक्तीने वसूल केली जाते.

औरंगाबाद शहराला जायकवाडीतून प्रतिदिनी १२० दशलक्ष लीटर पाणी मिळते. औरंगाबादची लोकसंख्या १६ लाख आहे. प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी प्रतिदिन घरगुती वापरासाठी मिळणे आवश्यक आहे. म्हणजे शहराची गरज २१६ दशलक्ष लीटर इतकी आहे. एक दिवसाआड पाणी देण्याचे मान्य केले तर महापालिकेला प्रतिदिन १०८ एमएलडी पाणी लागेल. म्हणजे पहिल्या दिवशी अर्धी लोकसंख्या असलेल्या भागात मनपा ११० एमएलडी साठ्यातून १०८ एमएलडी पाणी सहज पुरवू शकेल. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला दुसऱ्या दिवशी १०८ एमएलडी पाणी पुरविता येऊ शकेल. महापालिकेला एक दिवसआड पाणी पुरवणे अशक्य नाही. मात्र, यासाठी महापालिकेने जलकुंभाचे नियोजन करण्यावर भर देण्याची आवश्यकता नागरे यांनी व्यक्त केली आहे.