शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

होय, शहराला एक दिवसाआड पाणी पुरविता येणे शक्य: जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:02 IST

यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती ...

यासाठी महापालिकेच्या इच्छाशक्तीची गरज असून, ती नसल्यामुळे व सात ते आठ दिवसांनंतरही आलेल्या पाण्याने दिलेल्या वेदना सहन करण्याची शक्ती औरंगाबादकरांमध्ये आहे, हे ओळखून महापालिका पाणी पुरवठ्याच्या नियोजनात काही करताना दिसत नाही. हे आश्चर्यकारक होय, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून नागरे यांनी म्हटले की, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी औरंगाबादकरांची वर्षानुवर्षांची अवस्था आहे. हे शहर स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट असल्यामुळे पाण्यासारखी अत्यावश्यक गरज समाधानकारकरितीने पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली तर ती चुकीची ठरू नये.

पुणे हे शहर गरजेपेक्षा दीडपट पाणी वापरणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील महापालिकेने व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हे शक्य करून दाखवले आहे. दुसरीकडे औरंगाबादजवळच जायकवाडी धरण असतानाही औरंगाबादकरांना ३६५ दिवसातून फक्त ५५ ते ६० दिवस पाणी मिळते व दुसरीकडे ४०५० रुपये पाणीपट्टी मात्र सक्तीने वसूल केली जाते.

औरंगाबाद शहराला जायकवाडीतून प्रतिदिनी १२० दशलक्ष लीटर पाणी मिळते. औरंगाबादची लोकसंख्या १६ लाख आहे. प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी प्रतिदिन घरगुती वापरासाठी मिळणे आवश्यक आहे. म्हणजे शहराची गरज २१६ दशलक्ष लीटर इतकी आहे. एक दिवसाआड पाणी देण्याचे मान्य केले तर महापालिकेला प्रतिदिन १०८ एमएलडी पाणी लागेल. म्हणजे पहिल्या दिवशी अर्धी लोकसंख्या असलेल्या भागात मनपा ११० एमएलडी साठ्यातून १०८ एमएलडी पाणी सहज पुरवू शकेल. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला दुसऱ्या दिवशी १०८ एमएलडी पाणी पुरविता येऊ शकेल. महापालिकेला एक दिवसआड पाणी पुरवणे अशक्य नाही. मात्र, यासाठी महापालिकेने जलकुंभाचे नियोजन करण्यावर भर देण्याची आवश्यकता नागरे यांनी व्यक्त केली आहे.