शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

विष्णूपुरीत येवा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:16 IST

विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली असून सलग दुसºया दिवशी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली असून सलग दुसºया दिवशी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़२१ आॅगस्टच्या पहाटे नांदेड शहरासह जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती़ मृग नक्षत्रानंतर जवळपास सर्वच नक्षत्र कोरडे गेल्यामुळे तोंडचे पाणी पळालेल्या बळीराजाला मघा नक्षत्राने मोठा दिलासा दिला़ अतिवृष्टीमुळे पिकांना जीवदान मिळाले असून जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झाली होती़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी- पातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला होता़ त्यातून ३९६ क्युमेक्सने गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आला़ सकाळी दहा वाजता हा दरवाजा बंद करण्यात आला होता़ त्यावेळी प्रकल्पात ८० दलघमी साठा उपलब्ध होता़त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़ विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी अधूनमधून शहरासह काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यानंतर शुक्रवारी सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु असताना शहरात पाऊसही गणरायाच्या स्वागतासाठी आला होता़ दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरुच होती़विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती़ त्यामुळे शनिवारी प्रकल्पात ८०़७९ दलघमी एवढा पाणीसाठा झाला होता़ त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून ४१५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ शनिवारी दिवसभर अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने रात्री साडेनऊ वाजेनंतर मात्र चांगलाच जोर धरला होता़रात्री दीड वाजेपर्यंत पावसाने शहराला झोडपून काढले़ त्यानंतर मात्र विश्रांती घेतली़ रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती़ तासभर पडल्यानंतर दुपारी तीन वाजेपासून शहरात संततधार सुरु होती़ दुपारी चार वाजेनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातही झालेल्या पावसामुळे रविवारी प्रकल्पात ८०़७९ दलघमी एवढा पाणीसाठा झाला होता़ प्रकल्प १०० टक्के भरल्याने दुपारी ३ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला़ त्यातून ४७१ क्यूमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ विष्णूपुरीतून गेले दोन दिवस सलग सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीचे नदीपात्र खळाळून वाहत होते़