शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लोअर दुधना प्रकल्पात यावर्षी करणार शंभर टक्के जलसाठा

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़

मोहन बोराडे, सेलूनिम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रकल्प निर्मिती नंतर प्रथमच 60 टक्के पाणीसाठा झाला होता़ सध्या प्रकल्पात एकुण 53 टक्के पाणी साठा असून यातील 34 टक्के जिवंत पाणी साठा आहे़ 30 वर्षा पासून रखडलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम दोन वर्षापुर्वी पुर्ण झाले होते मात्र प्रकल्पाच्या कालव्यांची व वितरिकांची कामे अद्यापही सुरू आहेत़ त्यामुळे प्रकल्पातील पाणी शहराच्या पाणी पुरवठयासाठी वापरण्यात आले़ गेल्या वर्षी जालना जिल्हयासह निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला त्यामुळे मृतसाठयात असलेल्या प्रकल्पात 60 टक्के पाणी साठा झाला़ त्यामुळे सेलू व परतूर शहराला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे दुधनाच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेली त्यामुळे प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला़ या पाणी साठयामुळे सेलू व परतूर शहराला पाणी टंचाई पासून दिलासा मिळाला यावर्षी पावसाळयात पुर्ण क्षमतेने पाणी साठा करण्याची तयारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आहे़ जालना जिल्हयाच्या पावसावरच दुधना प्रकल्पाची पाण्याची मदार आहे़ जालना जिल्हयात चांगला पाऊस झाला तर प्रकल्पात वेगाने पाणी येते़ गतवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात 900.40 मि़मि़ पावसाची नोंद झालेली आहे़ यावर्षीही चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प तीन-चार पावसातच भरू शकतो़ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिंचनासाठी या पाण्याचा वापर होवू शकतो़ प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पुर्ण झाले आहे़ तर उजव्या कालव्याचे काम सुरू आहे़ यामुळे यावर्षी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले तर ऊस व फळबागेचे क्षेत्र वाढू शकते़ त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरण्याच्या हालचाली सुरू आहेत़ वरूण राजावर प्रकल्पाच्या पाण्याची मदार आहे़ (वार्ताहर)मत्स्य व्यवसायाला चालनानिम्न दुधना प्रकल्पात पाणी असल्यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सेलू व परिसरात मोठया प्रमाणावर मत्स्य व्यवसाय सुरू आहे तसेच इतर शहरातही दुधना प्रकल्पातील माशी पाठविण्यात येत आहे़ शहरात यापुर्वी इतर ठिकाणाहून मत्स्य आणून विक्री केली जात असत परंतु, दुधना प्रकल्पातील माशानाही मागणी वाढली आहे़ दरम्यान पाण्याचा वापर शहराला, सिंचनाला झाला तर शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील.