शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

लोअर दुधना प्रकल्पात यावर्षी करणार शंभर टक्के जलसाठा

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़

मोहन बोराडे, सेलूनिम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रकल्प निर्मिती नंतर प्रथमच 60 टक्के पाणीसाठा झाला होता़ सध्या प्रकल्पात एकुण 53 टक्के पाणी साठा असून यातील 34 टक्के जिवंत पाणी साठा आहे़ 30 वर्षा पासून रखडलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम दोन वर्षापुर्वी पुर्ण झाले होते मात्र प्रकल्पाच्या कालव्यांची व वितरिकांची कामे अद्यापही सुरू आहेत़ त्यामुळे प्रकल्पातील पाणी शहराच्या पाणी पुरवठयासाठी वापरण्यात आले़ गेल्या वर्षी जालना जिल्हयासह निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला त्यामुळे मृतसाठयात असलेल्या प्रकल्पात 60 टक्के पाणी साठा झाला़ त्यामुळे सेलू व परतूर शहराला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे दुधनाच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेली त्यामुळे प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला़ या पाणी साठयामुळे सेलू व परतूर शहराला पाणी टंचाई पासून दिलासा मिळाला यावर्षी पावसाळयात पुर्ण क्षमतेने पाणी साठा करण्याची तयारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आहे़ जालना जिल्हयाच्या पावसावरच दुधना प्रकल्पाची पाण्याची मदार आहे़ जालना जिल्हयात चांगला पाऊस झाला तर प्रकल्पात वेगाने पाणी येते़ गतवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात 900.40 मि़मि़ पावसाची नोंद झालेली आहे़ यावर्षीही चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प तीन-चार पावसातच भरू शकतो़ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिंचनासाठी या पाण्याचा वापर होवू शकतो़ प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पुर्ण झाले आहे़ तर उजव्या कालव्याचे काम सुरू आहे़ यामुळे यावर्षी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले तर ऊस व फळबागेचे क्षेत्र वाढू शकते़ त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरण्याच्या हालचाली सुरू आहेत़ वरूण राजावर प्रकल्पाच्या पाण्याची मदार आहे़ (वार्ताहर)मत्स्य व्यवसायाला चालनानिम्न दुधना प्रकल्पात पाणी असल्यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सेलू व परिसरात मोठया प्रमाणावर मत्स्य व्यवसाय सुरू आहे तसेच इतर शहरातही दुधना प्रकल्पातील माशी पाठविण्यात येत आहे़ शहरात यापुर्वी इतर ठिकाणाहून मत्स्य आणून विक्री केली जात असत परंतु, दुधना प्रकल्पातील माशानाही मागणी वाढली आहे़ दरम्यान पाण्याचा वापर शहराला, सिंचनाला झाला तर शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील.