शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

विहिरींची कामे ठप्प !

By admin | Updated: February 2, 2015 01:13 IST

परंडा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तब्बल १ हजार ५०२ विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात योजनेमध्ये झालेले

परंडा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तब्बल १ हजार ५०२ विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात योजनेमध्ये झालेले गैरप्रकार अन् कमी मजुरीमुळे मजुरांनी कामांकडे पाठ फिरविली. त्यामुळे चार वर्षांचा कालावधी लोटूनही तब्बल पावणेसातशे कामे अर्धवट स्वरूपात आहेत. त्यावर आता प्रशासनाने अशा कामांच्या पंचनाम्याची प्रक्रिया हाती घेतली असून आहे त्या अवस्थेत ‘फायनल’ करण्यात येत आहेत.सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात, यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक सिंचन विहिरी घेण्यास शासनाने मंजुरी दिली होती. सुरूवातीला २०१०-२०११ मध्ये अवघ्या दोनच विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र, विहिरींच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. २०११-१२ मध्ये तब्बल ६९८ विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०१२-१३ मध्ये ६२४ तर २०१३-२०१४ मध्ये १७८ विहिरींना मंजुरी मिळाली होती. परंतु, ज्या गतीने विहिरींना मंजुरी देण्यात येत होती, त्या गतीने कामे पूर्ण होत नव्हती. असे असतानाच तालुक्यातील काही ठिकाणी रस्ता कामांची चौकशी झाल्यानंतर गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. तसेच मजुरीही कमी मिळत असल्याने या कामांवर येण्यास मजूर धजावत नाहीत. परिणामी ही योजना ठप्प झाली आहे. परिणामी १ हजार ५०२ पैकी ८२७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित पावणेसातशे कामे अर्धवट आहेत. (वार्ताहर)पूर्ण झालेल्या ८२७ पैकी ४३७ विहिरींची देयके आजपर्यंत मिळू शकली नाहीत. देयकांसाठी शेतकरी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु, त्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. नव्याने पदभार स्वीकारलेले गटविकास अधिकारी नलावडे यांच्या डिजीटल स्वाक्षरीला अद्याप मान्यता मिळाली नसल्याने तब्बल ४३७ विहिरींची देयके रखडली आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना १४५ रूपये हजेरी दिली जाते. तर दुसरीकडे शेतातील कामासाठी दोनशे ते अडीचशे रूपये मिळतात. तेही रोख. तसेच रोहयोच्या मजुरीसाठी दहा ते पंधरा दिवस वाट बघावी लागते. त्यामुळे मजूर रोहयोच्या कामांकडे फिरकत नसल्याचे काही लाभार्थ्यांकडून सांगण्यात आले.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ८२७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. असे असले तरी त्यांना अद्याप देयके मिळू शकली नाहीत. जाकेपिंपरी येथील २५ विहिरी, भांडगाव येथील २८, दुधी १०, घारगाव १४, कंडारी १६, खासापुरी १६, लोणी ३०, मुगाव १४, पांढरेवाडी १५, रोहकल २६, साकत (खु.) २६, साकत (बु.) १३, सोनारी १४, टाकळी १३, वाकडी १२ तर सिरसाव येथील ३७ विहिरींची देयके अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. अनेकांनी कर्ज, उसणवारी करून विहिरींचे खोदकाम केले आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत सापडले आहेत.२०१२-१३ मध्ये विहिरींच्या खोदकाम मजुरीवर सुमारे ९ कोटी २४ लाख रूपये खर्च झाले आहेत. तसचे २०१३-१४ मध्ये ५ कोटी १८ लाख २४ हजार मजुरीवर तर विहिरीच्या साहित्यावर १ कोटी ६८ लाख ५२ हजार रूपये खर्च झाला. त्यानंतर रोहयोतील गैरप्रकार उजेडात आल्यानंतर योजनेच्या गतीवर परिणाम झाला. आज तर योजना ठप्प झाली आहे.