शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दानवेंच्या मंत्रिपदाबाबत कार्यकर्त्यांत उत्कंठा

By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खा. रावसाहेब दानवे यांना प्रतिनिधित्व मिळेल का, याविषयी महायुतीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खा. रावसाहेब दानवे यांना प्रतिनिधित्व मिळेल का, याविषयी महायुतीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. दानवे हे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार अशा एकापाठोपाठ पदांवर त्यांनी काम केलेले आहे. विशेषत: आतापर्यंत चोवीस निवडणुका लढविल्या, त्यापैकी २३ निवडणुकांत यश पटकाविले आहे. मतदारसंघासह राजकारणातील बारकावे दानवेंना चांगलेच माहिती आहेत. त्यामुळेच ते एक अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून या जिल्ह्यात ओळखले गेले आहेत. प्रत्येक निवडणुकीतून त्याचे प्रत्यंतर विरोधकांना आले आहे. चकवा म्हणून ते सुपरिचित राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दानवे हे २ लाख ६ हजारांच्या एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत हॅटट्रिक केलेल्या दानवे यांनी या निवडणुकीतच विजयाचा चौकार मारला. तोही एवढ्या मोठ्या मताधिक्याने. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी या विजयाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा दानवे बाळगून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात आपणास स्थान मिळावे, म्हणून दानवेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी भोकरदनच्या सभेतून घोषणा केली होती. त्याची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा दानवे समर्थकांमध्ये आहे. त्यामुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल, असा आशावाद समर्थक बाळगून आहेत. (प्रतिनिधी) शब्द खरा होईल ! या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी येथील जाहीर सभेतून रावसाहेब दानवे निवडून आल्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी ग्वाही जनतेला दिली होती. त्यामुळे आता गडकरींचा शब्द खरा होईल, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जाते.