शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘सातबारा’चे काम रखडले

By admin | Updated: December 15, 2015 00:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. सातबारा आॅनलाईन करण्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी खुलताबाद, कन्नड, फुलंब्री या ३ तालुक्यांचे सातबारा आॅनलाईन मिळतात. तर औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव या ६ तालुक्यांचे आॅनलाईन सातबारा करण्याचे काम रखडले आहे. त्यातच सेतू सुविधा केंद्राचा करार अद्याप झालेला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामासाठी समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल प्रशासनाचे कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे काम २ वर्षांपासून रखडले आहे. सातबाराच्या नोंदी आॅनलाईन करण्यासाठी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी सूचना दिल्या होत्या. आॅनलाईन करण्याचे काम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात होऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी देण्यात आलेल्या आदेशातून काही साध्य होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तलाठ्यांना सातबारा अपडेट करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातून सुविधा दिली होती. दर १५ दिवसांनी तलाठ्यांनी थम्बच्या साह्याने लॉगिंग करून सातबारा अपडेट करण्याचे सांगण्यात आले होते; परंतु संकेतस्थळ सुरू करताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने ते काम रेंगाळले. एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरने सातबारा आॅनलाईन केले जात असले तरी त्यांच्याकडे डाटा उपलब्ध नसल्यामुळे हे काम ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१३ मधील जुन्या रेकॉर्डनुसार सातबारा मिळत असून, नवीन नोंदीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. नवीन नोंदी नसल्यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उतारा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे तलाठ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना सातबारा मिळवावा लागत आहे. तलाठ्यांकडे अनेक कामे असल्याने त्यांच्याकडे चकरा माराव्या लागत असून, सातबारा उतारा मिळत नसल्याची ओरड होत आहे. खरेदीखताच्या नोंदणीसाठी आॅनलाईन सातबारा स्वीकारला जात नसून तलाठ्यांनी हाताने लिहिलेला सातबारा आणावा लागतो आहे.