शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

दुष्काळातही मजुरांच्या हाताला नसणार काम

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

विलास भोसले; पाटोदा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियम आणि निकषाप्रमाणे पूर्वीची अर्धवट अवस्थेत कामे असतील तर त्या गावात नव्याने काम सुरू करता येणार नाही.

विलास भोसले; पाटोदामहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियम आणि निकषाप्रमाणे पूर्वीची अर्धवट अवस्थेत कामे असतील तर त्या गावात नव्याने काम सुरू करता येणार नाही. या ग्रामपंचायत अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त कामे अर्धवट आहेत तेथे नवीन कामे सुरू होणार नसल्याने ऐन दुष्काळात मजुरांना काम मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कामाच्या माध्यमातून सार्वजनिक विकास आणि मजुरांना काम मिळत असल्याने तत्कालिन केंद्र सरकारने महाराष्ट्राची योजना देशभर राबविण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी रोजगार हमी योजना या नावाने ही योजना सुरू करून शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी दिली. २००८ पासून केंद्राची योजना राज्यात सुरू झाली. पाटोदा तालुक्यात या योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार कामे सुरू करण्यात आली. यामध्ये विहीर, रस्ते, रोपवाटिका, वृक्षलागवड, वृक्ष संवर्धन, तलावातील गाळ काढणे, अशा स्वरुपाच्या कामांचा समावेश आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू झाल्यानंतर या कामात मजुरांच्या नावाने पोस्टात खाते उघडण्यापासून बोगस कारभाराच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक कामे अर्धवट राहिली व बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली. या कामाच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम लागले होते. मात्र तक्रारीअंती ही कामे अर्धवट अवस्थेत राहिली. यामध्ये व्यक्तीगत लाभाच्या विहिरीच्या कामाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आली.शासन नियमानुसार नवीन कामे सुरू करण्यात अडचण निर्माण झाल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सुमारे चार हजार कामे आहे त्या स्थितीत पूर्ण दाखवा, असे आदेश काढून नव्याने कामे सुरू करण्यासाठी मार्ग काढला. यापूर्वीही तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीअंतर्गत सुमारे १ हजार कामे अर्धवट आहेत. ज्या ग्रामपंचायतींकडे पाचपेक्षा जास्त कामे अर्धवट आहेत. तेथे नवीन कामे न घेण्याच्या निर्देशामुळे नव्याने मान्यता बंद आहेत. सध्या तालुक्यातील सर्वसाधारणपणे एका ग्रामपंचायतकडे दहा ते वीस कामे अर्धवट आहेत. त्यामुळे नवीन काम मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. परिणामी नवीन कामाबाबत प्रशासनाकडे आढावा अथवा सूचना किंवा प्रस्तावित कामेच नाहीत. या पलिकडे एखादे काम सुरू करायचे असल्यास त्या कामास रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच कामे सुरू करता येतात, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. या योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येंनी कामे सुरू झाली होती. यामध्ये विहिरी, रस्ते, रोपवाटिका, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, तलावातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश होता. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीतही लोकांच्या हाताला काम होते. मात्र या योजनेचे बदलते निकष पाहता यंदा दुष्काळी परिस्थितही कामे मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांवर बेरोजगारीचे संकट उभे आहे.