शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

ब्रम्हगव्हाणच्या कालव्याच्या कामाला लागणार ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:05 IST

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या (टप्पा २) कालवा क्र. १ च्या ५४ कोटी रुपयांच्या निविदाप्रकरणी ...

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या (टप्पा २) कालवा क्र. १ च्या ५४ कोटी रुपयांच्या निविदाप्रकरणी शासन आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात खेळ सुरू आहे. मार्च २०२१ मध्ये विनानिविदा दिलेले काम रद्द करण्याचा निर्णय महामंडळ मुख्य अभियंत्यांनी घेतल्यानंतर त्या निर्णयास शासनाने स्थगिती दिल्यामुळे निविदेचे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडणार असून, योजनेच्या कामाला थेट ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

नियमबाह्य सबलेट (निविदा न काढताच काम वर्ग करणे) केल्याने जलसंपदाच्या मुख्य अभियंत्यांनी ३ मार्च रोजी जुनी निविदा रद्द केली होती. त्या निविदा रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी, असे आदेश राज्य सरकारने काढले असून, ज्या मुख्य अभियंत्यांनी ही निविदा रद्द केली त्यांनाच स्थगिती देण्याची वेळ आली आहे.

ब्रह्मगव्हाण योजनेतील ३७ कि.मी. लांबीच्या कालव्याचे ५४ कोटी रुपयांचे कंत्राट अंबरवाडीकर अ‍ॅण्ड सन्स या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर किरण वाडी यांच्या रवीकिरण कन्स्ट्रक्शन्सला प्रथमत: हे काम सबलेट केले गेले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये साहस कन्स्ट्रक्शनला दस्तनोंदणी करून दुसऱ्यांदा काम सबलेट केले गेले. २०१० ते २०२१ या ११ वर्षांत योजनेचे काम गतीने पुढे सरकले नाही; मात्र काम सबलेट करण्याचे काम गतीने झाले.

दरम्यान, कामाला विलंब झाल्यामुळे मूळ कंत्राटदार कंपनी अंबरवारडीकर अ‍ॅण्ड सन्सला सव्वातीन कोटी रुपयांचा दंड एका चौकशी समितीने लावला. दरम्यान, स्थानिक पातळीवरून मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांकडे कंत्राटदारास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी जलसंपदा खात्याच्या आदेशाने सहा अभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालानुसार ५४ कोटींचे काम नियमबाह्यरीत्या सबलेट केल्याने मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांनी मार्च २०२१ मध्ये निविदा रद्द केली. हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्टदेखील आहे.

कार्यकारी संचालकांना आले पत्र

महामंडळ कार्यकारी संचालकांना जलसंपदा विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या निविदा कामास मुदतवाढ मिळण्याबाबत स्थानिक पातळीवरून मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मुख्य अभियंत्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये योजनेची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशास स्थगिती देऊन अहवाल सादर करावा, असे शासनाचे पत्र आहे. कार्यकारी संचालकांनी मुख्य अभियंत्यांकडे ते पत्र वर्ग केले. आता मुख्य अभियंता आपला निर्णय मागे घेतात की निर्णयावर ठाम राहतात. हे येणाऱ्या काळात कळेल. दरम्यान, मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांच्याशी संपर्क केला असता, बैठकीत असल्याचे सांगून त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.