शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांच्या लेखनाचा संबंध चारित्र्याशी जोडला जातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:03 IST

औरंगाबाद : स्त्रियांना लिखाणाचे स्वातंत्र्य मिळत नाही. पुरुषांच्या सोयीची व्यवस्था असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्त्रियांनी काही लेखन ...

औरंगाबाद : स्त्रियांना लिखाणाचे स्वातंत्र्य मिळत नाही. पुरुषांच्या सोयीची व्यवस्था असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्त्रियांनी काही लेखन केल्यास त्याचा संबंध चारित्र्याशी जोडण्याची प्रथा आपल्याकडे रुजविण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवस्थेला उद्ध्वस्त करीत स्त्रीला स्वतंत्रपणे लिहिता येईल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परिसंवादात मान्यवरांनी केले.

मराठवाडा साहित्य संमेलनात प्र.ई. सोनकांबळे व्यासपीठावर आयोजित चौथ्या परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी स्त्रीवादावर चर्चा करताना मराठी लेखिका-कवयित्रींच्या लेखनासंबंधीचे अनेक पदर उलगडून दाखवले. ललिता गादगे यांच्या अध्यक्षेखाली ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे’ या विषयावर परिसंवाद रंगला. या विषयावर बोलताना भगवान काळे, समिता जाधव, योगिनी सातारकर-पांडे, शिवराज गोपाळे, महेश मंगनाळे यांनी विषयांच्या दोन्ही बाजूंनी प्ररखड भाष्य केले. यावेळी काही मान्यवरांनी मराठी लेखिका व कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले असल्याची भावना व्यक्त केली, तर काहींनी बंडखोर लेखिका व कवयित्रींचा दाखला देत लेखन स्त्रीवादात अडकल्याची गोष्ट अमान्य केली. स्त्रियांच्या व्यथा व वेदना या स्त्रियांच्या लेखनातून समोर येण्याची गरज काळे यांनी व्यक्त केली, तर सविता जाधव यांनी पुरुषी मानसिकतेच्या समाजात स्त्री मोकळेपणाने लिहू शकत नसल्याचे मत व्यक्त केले. जगभरातील निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे. पण यापैकी किती टक्के स्त्रियांना स्वत:च्या अधिकाराची जाणीव आहे. यापैकी किती टक्के स्त्रिया मुक्तपणे लिहू शकतात, असे प्रश्न व्यवस्थेला विचारात लेखनात मुक्तसंचार आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली. योगिनी सातारकर यांनी विविध बंडखोर कवयित्रींचे दाखले देत मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादाच्या अडगळती पडले नसल्याचे स्पष्ट केले. तसचे स्त्री ही माणूस व व्यक्ती म्हणून व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.