शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

लांडग्याचा हल्ला; नऊ शेळ्या ठार, तीन जखमी

By admin | Updated: January 22, 2016 00:14 IST

पिंप्रीराजा : औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांच्या ९ शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला करून ठार मारल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत

पिंप्रीराजा : औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांच्या ९ शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला करून ठार मारल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीमध्ये शेतकरी रेणुबा रांजणे राहतात. त्यांच्याकडे १४ शेळ्या व बैलजोडी असून बुधवारी पहाटे या शेळ्यांवर लांडग्याच्या कळपाने हल्ला करून ९ शेळ्या ठार केल्या, तर ३ शेळ्या गंभीर जमखी आहेत. ठार मारलेल्या शेळ्यांचे लचके नंतर कुत्र्यांनीही तोडणे सुरू केले होते. पशुवैद्यकीय अधिकारी नरवडे यांनी वैद्यकीय तपासणी करीत हा हल्ला लांडग्यांचा असल्याचा निष्कर्ष व्यक्त केला. यावेळी वन विभागाचे अधिकारी यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्यास एक दिवस उशीर झाला. पशुवैद्यकीय अधिकारी व वन विभागाने एक दिवस उशिराने पंचनामा केला. लांडग्यांच्या हल्ल्यात लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना वन विभागाने योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागात डुकरांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. महापालिका बेवारस कुत्र्यांना पकडून ग्रामीण भागात आणून सोडत आहे. अनेक गावांत जनावरांचा चावा घेऊन नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने बेवारस कुत्रे खेड्यात सोडून त्यांचे जीवन धोक्यात आणू नये तसेच वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे.