शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वेतन रखडल्याने पुनर्वसनाला खीळ !

By admin | Updated: July 19, 2014 00:41 IST

बाळासाहेब जाधव, लातूर ठाणे जिल्ह्यातील विरारच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील अपंग लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे़ मात्र अपंग कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे.

बाळासाहेब जाधव, लातूरठाणे जिल्ह्यातील विरारच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील अपंग लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे़ मात्र अपंग पुनर्वसनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या कामाला खीळ बसली आहे. अपंग पुनर्वसन उपक्रमातून लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ६१६७ अपंगांना लाभ देण्यात आला आहे. परंतु, अपंग पुनर्वसनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील १७ कर्मचाऱ्यांचे गेल्या अडीच वर्षांपासून वेतन रखडले आहे. पुनर्वसनाचे काम करणाऱ्यांवरच पुनर्वसनाची वेळ आली आहे.केंद्र शासनाच्या मदतीने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विरारसह महाराष्ट्रातील नाशिक, चंद्रपूर, लातूर या तीन केंद्राच्या ठिकाणी अपंगाचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र उभारण्यात आली़ त्यांनी केलेल्या कार्याचा पाठपुरावा करून तेथील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले़ त्याच धर्तीवर इतर केंद्रातील कर्मचारीही कायम होतील या आशेवर या तीनही केंद्राने काम सुरू केले़ परंतु केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या केंद्रातील अपंगाचे पुनर्वसन करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे लक्ष दिले नाही़ परिणामी, अल्पावधीतच नाशिक व चंद्रपूर येथील केंद्र बंद पडले. परंतु, लातुरातील केंद्राचे काम आजतागायत सुरू आहे. मात्र या केंद्रातील १७ कर्मचाऱ्यांचे गेल्या अडीच वर्षांपासून वेतन बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लातूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून ३१ हजार ३३३ अपंग लाभार्थ्यांची नोंद जुलै २०१४ अखेर करण्यात आली़ अपंग लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी विविध शाळा-महाविद्यालयामध्ये १५० शिबिरे घेण्यात आली़ या केंद्राच्या माध्यमातून ४६४ अपंग लाभार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्यातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले़ ७०० अपंग लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव सादर करून २८२ लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले़ मात्र आता या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अनुदानही रखडले...केंद्राकडून अपंग पुनर्वसन संस्थेच्या कामासाठी अनुदान येते. परंतु, गेल्या अडीच वर्षांपासून अनुदान बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन नाही. तरीही अपंगाच्या पुनर्वसनाचा लळा असल्याने या कर्मचाऱ्यांचे काम सुरूच आहे. अनुदान मिळताच कर्मचाऱ्यांच्या पगारी सुरळीत सुरू राहतील, असे या केंद्राचे प्रकल्प संचालक बाबुराव सोमवंशी यांनी सांगितले.