शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

हिवाळ्यातील सुक्यामेव्याला नोटाबंदी बाधली !

By admin | Updated: January 15, 2017 23:22 IST

जालना : यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे

जालना : हिवाळा ऋतू आरोग्यासाठी लाभदायक असल्याने हा ऋतु सर्वांनाच आवडतो. त्यामुळे हिवाळ्यात खारीक, खोबरे, काजू, अंजीर, अक्रोड, बदाम अशा सुक्या मेव्याला मागणी असते. परंतु, यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे. दरम्यान, खारीक- खोबऱ्याच्या दरात घसरण झाली असून, काजू, अंजीरच्या जवळपास दीडपट वाढ झाली आहे.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतुंपैकी सर्वांना आवडणारा ऋतू हा हिवाळा होय. उन्हाळ्यात वारंवार पाण्यासाठी जीव व्याकूळ होतो. तसेच कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. पावसाळ्यात सततच्या रिपरिपमुळे घराबाहेरही पडणे कठीण वाटते. त्यामुळे हिवाळा ऋतु हा आरोग्यासाठी पोषक असल्याने तो सर्वांनाच मानवतो.हिवाळा ऋतु सुरु झाला की, शहरातील बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या मागणीस सुरुवात होते. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात होते. यंदाही सुकामेवा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. परंतु, नोटबंदीचा त्यावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.परिणामी, सुक्यामेव्याचा बाजार थंडच आहे. शहरातील बाजारपेठेत सध्या खारीक ६०- १०० रु. प्रति किलो, खोबरं ८०- १२०, काजू ८००- १२००, बदाम ६००- ८००, मनुके १८०- ३००, अंजीर ४००- ८००, अक्रोड ५००, डिंक २५०- ६००, गोटीगुळंबी ५००, मेथी ५०-८० रुपये प्रतिकिलो आहे. गतवर्षीच्या तुलनेत खारीकचा दर ४० रुपयांनी, खोबरं ६० ते ८० रुपयांनी घसरले आहे. तसेच मेथीही घसरली आहे. (प्रतिनिधी)