शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

हिवाळ्यातील सुक्यामेव्याला नोटाबंदी बाधली !

By admin | Updated: January 15, 2017 23:22 IST

जालना : यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे

जालना : हिवाळा ऋतू आरोग्यासाठी लाभदायक असल्याने हा ऋतु सर्वांनाच आवडतो. त्यामुळे हिवाळ्यात खारीक, खोबरे, काजू, अंजीर, अक्रोड, बदाम अशा सुक्या मेव्याला मागणी असते. परंतु, यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे. दरम्यान, खारीक- खोबऱ्याच्या दरात घसरण झाली असून, काजू, अंजीरच्या जवळपास दीडपट वाढ झाली आहे.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतुंपैकी सर्वांना आवडणारा ऋतू हा हिवाळा होय. उन्हाळ्यात वारंवार पाण्यासाठी जीव व्याकूळ होतो. तसेच कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. पावसाळ्यात सततच्या रिपरिपमुळे घराबाहेरही पडणे कठीण वाटते. त्यामुळे हिवाळा ऋतु हा आरोग्यासाठी पोषक असल्याने तो सर्वांनाच मानवतो.हिवाळा ऋतु सुरु झाला की, शहरातील बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या मागणीस सुरुवात होते. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात होते. यंदाही सुकामेवा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. परंतु, नोटबंदीचा त्यावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.परिणामी, सुक्यामेव्याचा बाजार थंडच आहे. शहरातील बाजारपेठेत सध्या खारीक ६०- १०० रु. प्रति किलो, खोबरं ८०- १२०, काजू ८००- १२००, बदाम ६००- ८००, मनुके १८०- ३००, अंजीर ४००- ८००, अक्रोड ५००, डिंक २५०- ६००, गोटीगुळंबी ५००, मेथी ५०-८० रुपये प्रतिकिलो आहे. गतवर्षीच्या तुलनेत खारीकचा दर ४० रुपयांनी, खोबरं ६० ते ८० रुपयांनी घसरले आहे. तसेच मेथीही घसरली आहे. (प्रतिनिधी)