शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

हिवाळ्यातील सुक्यामेव्याला नोटाबंदी बाधली !

By admin | Updated: January 15, 2017 23:22 IST

जालना : यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे

जालना : हिवाळा ऋतू आरोग्यासाठी लाभदायक असल्याने हा ऋतु सर्वांनाच आवडतो. त्यामुळे हिवाळ्यात खारीक, खोबरे, काजू, अंजीर, अक्रोड, बदाम अशा सुक्या मेव्याला मागणी असते. परंतु, यंदा या सुक्या मेव्याच्या विक्रीला नोटबंदी बाधली आहे. दरम्यान, खारीक- खोबऱ्याच्या दरात घसरण झाली असून, काजू, अंजीरच्या जवळपास दीडपट वाढ झाली आहे.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतुंपैकी सर्वांना आवडणारा ऋतू हा हिवाळा होय. उन्हाळ्यात वारंवार पाण्यासाठी जीव व्याकूळ होतो. तसेच कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. पावसाळ्यात सततच्या रिपरिपमुळे घराबाहेरही पडणे कठीण वाटते. त्यामुळे हिवाळा ऋतु हा आरोग्यासाठी पोषक असल्याने तो सर्वांनाच मानवतो.हिवाळा ऋतु सुरु झाला की, शहरातील बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या मागणीस सुरुवात होते. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात होते. यंदाही सुकामेवा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. परंतु, नोटबंदीचा त्यावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.परिणामी, सुक्यामेव्याचा बाजार थंडच आहे. शहरातील बाजारपेठेत सध्या खारीक ६०- १०० रु. प्रति किलो, खोबरं ८०- १२०, काजू ८००- १२००, बदाम ६००- ८००, मनुके १८०- ३००, अंजीर ४००- ८००, अक्रोड ५००, डिंक २५०- ६००, गोटीगुळंबी ५००, मेथी ५०-८० रुपये प्रतिकिलो आहे. गतवर्षीच्या तुलनेत खारीकचा दर ४० रुपयांनी, खोबरं ६० ते ८० रुपयांनी घसरले आहे. तसेच मेथीही घसरली आहे. (प्रतिनिधी)