शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चढाई करूनच पालिकेची लढाई जिंकू

By admin | Updated: July 24, 2016 00:44 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद काँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली

विशाल सोनटक्के , उस्मानाबादकाँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली आणि अल्पावधीतच पक्षाला थंपींग मेजॉरिटी मिळाली. सध्याचा काळ हा काँग्रेससाठी अडचणीचा असला तरी भाजपा सरकारचा कारभार पाहता येणाऱ्या काळात काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्यातील पालिकांची लढाई चढाई करूनच जिंकू. तोच आमचा स्वभाव आहे, अशा शब्दांत आ. मधुकरराव चव्हाण यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले. जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. या बँकेला सरकारने ताकद देण्याची आवश्यकता असून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मग त्यात काही आमचे असतील तरी चालतील. मात्र, बँक वाचवावी. नुसते साप-साप म्हणून भुई धोपटू नये, अशी टिप्पणीही केली. आ. मधुकरराव चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी संवाद साधला. १९५७ मध्ये काँग्रेसची सुरूवात झाली. त्यावेळी व्यंकटराव काका नळदुर्गकर, साहेबराव दादा, तुळशीराम पाटील आदींसोबत सायकलवरून पक्षाचा प्रचार केला. त्यावेळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष तुल्यबळ होते. उध्दवरावांच्या नेतृत्वाखाली नरसिंगराव काटीकर शेकापची ताकद वाढवत होते. मात्र, त्यावेळी राजकारणाचे स्वरुप वेगळे होते. मतदारांबरोबरच कार्यकर्ताही शब्द पाळणारा, निष्ठा ठेवणारा होता. १९८४ ला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मला निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हातात त्यावेळी कारखाना होता. मात्र, त्यानंतरही माझा मतदारसंघ नसतानाही कार्यकर्त्यांच्या जिवावर मी निवडणूक लढलो आणि अवघ्या अडीच-तीन हजाराने पराभव झाला. मात्र, पक्षाचे काम सुरूच होते. पं. स. उपसभापती, त्यानंतर सभापती, भूविकास, जिल्हा बँकेचा चेअरमन, १९९४-९५ दरम्यान राज्य बँकेचा अध्यक्ष, मार्केटींग फेडरेशनचा अध्यक्ष आदी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९९० ला आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर १९९५ ला पराभव पहावा लागला. मात्र, १९९९ पासून आजपर्यंत सातत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणूनही वंचित, कष्टकऱ्यांसाठी मोठे काम करता आले. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना वरवरच्या उपायांऐवजी शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल माफ करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत जिल्हा बँकेबरोबरच जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांना मदत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता सात टीएमसीचीच भाषा केली जात आहे. मग, २१ टीएमसीच्या नावाने भूमिपूजन केले कसे? या प्रकल्पासाठी तेव्हाच पैसे दिले असते तर आजवर जिल्ह्याला पाणी मिळाले असते. हक्काचे पाणीच कायमस्वरूपी दुष्काळावर उतारा असल्याचे ते म्हणाले. सात टीएमसी लवकर मिळावेत म्हणून आग्रह जरूर धरा. परंतु त्यातून केवळ भूम, परंडा आणि तुळजापूरचा प्रश्न मिटेल. उर्वरित जिल्ह्याचा प्रश्न्न मिटविण्यासाठी २१ टीएमसीचाच मुद्दा लावून धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पावणेतीन टीएमसीमुळे तुळजापूर तालुक्याचे भागू शकते. याद्वारे तालुक्यात साठ-सत्तर लाख एकर जमीन पाण्याखाली येईल. सद्यस्थितीत ८० साठवण तलाव व साडेचारशे पाझर तलाव तालुक्यात आहेत. त्यामुळे उर्वरित कामासाठी ५०० कोटी दिल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, असे ते म्हणाले. रामदऱ्यातून पाणी आणण्यासाठी पंपिंग हाऊसचे टेंडर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.