शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

चढाई करूनच पालिकेची लढाई जिंकू

By admin | Updated: July 24, 2016 00:44 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद काँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली

विशाल सोनटक्के , उस्मानाबादकाँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली आणि अल्पावधीतच पक्षाला थंपींग मेजॉरिटी मिळाली. सध्याचा काळ हा काँग्रेससाठी अडचणीचा असला तरी भाजपा सरकारचा कारभार पाहता येणाऱ्या काळात काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्यातील पालिकांची लढाई चढाई करूनच जिंकू. तोच आमचा स्वभाव आहे, अशा शब्दांत आ. मधुकरराव चव्हाण यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले. जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. या बँकेला सरकारने ताकद देण्याची आवश्यकता असून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मग त्यात काही आमचे असतील तरी चालतील. मात्र, बँक वाचवावी. नुसते साप-साप म्हणून भुई धोपटू नये, अशी टिप्पणीही केली. आ. मधुकरराव चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी संवाद साधला. १९५७ मध्ये काँग्रेसची सुरूवात झाली. त्यावेळी व्यंकटराव काका नळदुर्गकर, साहेबराव दादा, तुळशीराम पाटील आदींसोबत सायकलवरून पक्षाचा प्रचार केला. त्यावेळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष तुल्यबळ होते. उध्दवरावांच्या नेतृत्वाखाली नरसिंगराव काटीकर शेकापची ताकद वाढवत होते. मात्र, त्यावेळी राजकारणाचे स्वरुप वेगळे होते. मतदारांबरोबरच कार्यकर्ताही शब्द पाळणारा, निष्ठा ठेवणारा होता. १९८४ ला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मला निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हातात त्यावेळी कारखाना होता. मात्र, त्यानंतरही माझा मतदारसंघ नसतानाही कार्यकर्त्यांच्या जिवावर मी निवडणूक लढलो आणि अवघ्या अडीच-तीन हजाराने पराभव झाला. मात्र, पक्षाचे काम सुरूच होते. पं. स. उपसभापती, त्यानंतर सभापती, भूविकास, जिल्हा बँकेचा चेअरमन, १९९४-९५ दरम्यान राज्य बँकेचा अध्यक्ष, मार्केटींग फेडरेशनचा अध्यक्ष आदी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९९० ला आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर १९९५ ला पराभव पहावा लागला. मात्र, १९९९ पासून आजपर्यंत सातत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणूनही वंचित, कष्टकऱ्यांसाठी मोठे काम करता आले. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना वरवरच्या उपायांऐवजी शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल माफ करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत जिल्हा बँकेबरोबरच जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांना मदत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता सात टीएमसीचीच भाषा केली जात आहे. मग, २१ टीएमसीच्या नावाने भूमिपूजन केले कसे? या प्रकल्पासाठी तेव्हाच पैसे दिले असते तर आजवर जिल्ह्याला पाणी मिळाले असते. हक्काचे पाणीच कायमस्वरूपी दुष्काळावर उतारा असल्याचे ते म्हणाले. सात टीएमसी लवकर मिळावेत म्हणून आग्रह जरूर धरा. परंतु त्यातून केवळ भूम, परंडा आणि तुळजापूरचा प्रश्न मिटेल. उर्वरित जिल्ह्याचा प्रश्न्न मिटविण्यासाठी २१ टीएमसीचाच मुद्दा लावून धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पावणेतीन टीएमसीमुळे तुळजापूर तालुक्याचे भागू शकते. याद्वारे तालुक्यात साठ-सत्तर लाख एकर जमीन पाण्याखाली येईल. सद्यस्थितीत ८० साठवण तलाव व साडेचारशे पाझर तलाव तालुक्यात आहेत. त्यामुळे उर्वरित कामासाठी ५०० कोटी दिल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, असे ते म्हणाले. रामदऱ्यातून पाणी आणण्यासाठी पंपिंग हाऊसचे टेंडर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.