शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चढाई करूनच पालिकेची लढाई जिंकू

By admin | Updated: July 24, 2016 00:44 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद काँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली

विशाल सोनटक्के , उस्मानाबादकाँग्रेसला चढ-उतार नवीन नाहीत. एकेकाळी इंदिरा गांधींचाही पराभव झाल्याचे देशाने पाहिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काँग्रेस संघर्ष करीत उभी राहिली आणि अल्पावधीतच पक्षाला थंपींग मेजॉरिटी मिळाली. सध्याचा काळ हा काँग्रेससाठी अडचणीचा असला तरी भाजपा सरकारचा कारभार पाहता येणाऱ्या काळात काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्यातील पालिकांची लढाई चढाई करूनच जिंकू. तोच आमचा स्वभाव आहे, अशा शब्दांत आ. मधुकरराव चव्हाण यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले. जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. या बँकेला सरकारने ताकद देण्याची आवश्यकता असून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मग त्यात काही आमचे असतील तरी चालतील. मात्र, बँक वाचवावी. नुसते साप-साप म्हणून भुई धोपटू नये, अशी टिप्पणीही केली. आ. मधुकरराव चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी संवाद साधला. १९५७ मध्ये काँग्रेसची सुरूवात झाली. त्यावेळी व्यंकटराव काका नळदुर्गकर, साहेबराव दादा, तुळशीराम पाटील आदींसोबत सायकलवरून पक्षाचा प्रचार केला. त्यावेळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष तुल्यबळ होते. उध्दवरावांच्या नेतृत्वाखाली नरसिंगराव काटीकर शेकापची ताकद वाढवत होते. मात्र, त्यावेळी राजकारणाचे स्वरुप वेगळे होते. मतदारांबरोबरच कार्यकर्ताही शब्द पाळणारा, निष्ठा ठेवणारा होता. १९८४ ला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मला निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हातात त्यावेळी कारखाना होता. मात्र, त्यानंतरही माझा मतदारसंघ नसतानाही कार्यकर्त्यांच्या जिवावर मी निवडणूक लढलो आणि अवघ्या अडीच-तीन हजाराने पराभव झाला. मात्र, पक्षाचे काम सुरूच होते. पं. स. उपसभापती, त्यानंतर सभापती, भूविकास, जिल्हा बँकेचा चेअरमन, १९९४-९५ दरम्यान राज्य बँकेचा अध्यक्ष, मार्केटींग फेडरेशनचा अध्यक्ष आदी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९९० ला आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर १९९५ ला पराभव पहावा लागला. मात्र, १९९९ पासून आजपर्यंत सातत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणूनही वंचित, कष्टकऱ्यांसाठी मोठे काम करता आले. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना वरवरच्या उपायांऐवजी शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल माफ करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत जिल्हा बँकेबरोबरच जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांना मदत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता सात टीएमसीचीच भाषा केली जात आहे. मग, २१ टीएमसीच्या नावाने भूमिपूजन केले कसे? या प्रकल्पासाठी तेव्हाच पैसे दिले असते तर आजवर जिल्ह्याला पाणी मिळाले असते. हक्काचे पाणीच कायमस्वरूपी दुष्काळावर उतारा असल्याचे ते म्हणाले. सात टीएमसी लवकर मिळावेत म्हणून आग्रह जरूर धरा. परंतु त्यातून केवळ भूम, परंडा आणि तुळजापूरचा प्रश्न मिटेल. उर्वरित जिल्ह्याचा प्रश्न्न मिटविण्यासाठी २१ टीएमसीचाच मुद्दा लावून धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पावणेतीन टीएमसीमुळे तुळजापूर तालुक्याचे भागू शकते. याद्वारे तालुक्यात साठ-सत्तर लाख एकर जमीन पाण्याखाली येईल. सद्यस्थितीत ८० साठवण तलाव व साडेचारशे पाझर तलाव तालुक्यात आहेत. त्यामुळे उर्वरित कामासाठी ५०० कोटी दिल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, असे ते म्हणाले. रामदऱ्यातून पाणी आणण्यासाठी पंपिंग हाऊसचे टेंडर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.